मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत शुक्रवारी वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आला असून न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत होती. त्या पार्श्वभूमीवर आज विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडली. ईडीने अनिल देशमुखांची कोठडी वाढवून मागितली होती. तर, अनिल देशमुखांच्या वतीने कोठडीला विरोध करत युक्तिवाद केला. मात्र, आम्हाला केवळ त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे किमान दोन दिवस ईडी कोठडी वाढवावी, असे म्हणणे ईडीकडून मांडण्यात आले.
देशमुख ईडीसमोर बाजू मांडत असताना त्यांनी ‘मी ईडीची २०० हून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत,’ अशी माहिती दिली. तसेच, ‘मला १० दिवस ईडी कोठडीत ठेवण्यात आले. अधिकाऱ्यांनी भरपूर प्रश्न विचारले. जवळपास ८ ते दहा तास चौकशी झाली, असे देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी तुमची छळवणूक केली का?, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला असता देशमुख यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.
‘सचिन वाझेची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडी म्हणत आहे. मात्र, ईडीने वाझेला या प्रकरणात अद्याप एकदाही अटक करून कोठडी मिळवलेली नाही. देशमुख यांच्या पीए आणि सचिवांना अटक केली. आता खासगी व्यक्तींची चौकशी करायची आहे, देशमुख यांच्या मतदारसंघातील एका व्यक्तीसमोर बसवून देशमुख यांची चौकशी करायची असल्याचे ईडीने सांगितले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायधीशांनी अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला आहे.
अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही शुक्रवारी दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुख कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी गेले होते. मात्र, अद्याप ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयानं दिलासा दिलेला नाही. देशमुख यांच्या जामीन अर्जावर आता २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तर, अनिल देशमुख यांना देखील १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…