मुंबईत कोरोना नियंत्रणात

  46


केवळ १५ इमारती सील




मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता सील बंद केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी होताना पाहायला मिळत आहे. मुंबईत पूर्ण सील केलेल्या इमारती या आता केवळ १५ असल्याचे समजते.


गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तर कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले. कोरोना प्रतिबंधक लस सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.


कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाटही पालिकेने थोपवली असून सध्या मुंबईतील रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर दिसत आहे. मात्र असे असताना वर्षा अखेरपर्यंत मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.


वर्षाअखेर पर्यंत सण किंवा त्यामुळे होणारी गर्दी पाहता पालिकेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.


दिवसभरात २६२ रुग्णांची नोंद


दरम्यान मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णाची संख्या ही २६२ आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ही २९०६आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका आहे. तर कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के आणि रूग्ण दुपटीचा दर २१३६ दिवस आहे. तसेच पूर्ण सील केलेल्या इमारती या केवळ १५ आहेत तर कंटेन्मेंट झोन झोपडपट्टी आणि चाळींमध्ये शून्य असल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

अनंत चतुर्दशीनिमित्त चर्नी रोड स्थानकावरील लोकल गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जलद लोकल गाड्या येत्या शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १०:३० पर्यंत मुंबई

बापरे, 'झोमॅटो'वरुन ऑर्डर करणे होणार एवढे महाग

मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात