मुंबईत कोरोना नियंत्रणात

Share

केवळ १५ इमारती सील

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता सील बंद केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी होताना पाहायला मिळत आहे. मुंबईत पूर्ण सील केलेल्या इमारती या आता केवळ १५ असल्याचे समजते.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तर कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले. कोरोना प्रतिबंधक लस सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाटही पालिकेने थोपवली असून सध्या मुंबईतील रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर दिसत आहे. मात्र असे असताना वर्षा अखेरपर्यंत मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

वर्षाअखेर पर्यंत सण किंवा त्यामुळे होणारी गर्दी पाहता पालिकेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दिवसभरात २६२ रुग्णांची नोंद

दरम्यान मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णाची संख्या ही २६२ आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ही २९०६आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका आहे. तर कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के आणि रूग्ण दुपटीचा दर २१३६ दिवस आहे. तसेच पूर्ण सील केलेल्या इमारती या केवळ १५ आहेत तर कंटेन्मेंट झोन झोपडपट्टी आणि चाळींमध्ये शून्य असल्याचे समोर आले आहे.

Recent Posts

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.…

1 minute ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

19 minutes ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

32 minutes ago

भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…

36 minutes ago

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

1 hour ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

2 hours ago