मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता सील बंद केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी होताना पाहायला मिळत आहे. मुंबईत पूर्ण सील केलेल्या इमारती या आता केवळ १५ असल्याचे समजते.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तर कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले. कोरोना प्रतिबंधक लस सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाटही पालिकेने थोपवली असून सध्या मुंबईतील रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर दिसत आहे. मात्र असे असताना वर्षा अखेरपर्यंत मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
वर्षाअखेर पर्यंत सण किंवा त्यामुळे होणारी गर्दी पाहता पालिकेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णाची संख्या ही २६२ आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ही २९०६आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका आहे. तर कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के आणि रूग्ण दुपटीचा दर २१३६ दिवस आहे. तसेच पूर्ण सील केलेल्या इमारती या केवळ १५ आहेत तर कंटेन्मेंट झोन झोपडपट्टी आणि चाळींमध्ये शून्य असल्याचे समोर आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…