दुबई (वृत्तसंस्था) : भारताने नामिबियावर नऊ विकेट राखून शानदार विजय टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचा शेवट गोड केला. तसेच कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना विजयी निरोप दिला. सामना संपल्यानंतर रवी शास्त्री यांनी ड्रेसिंगरूममध्ये भावनिक भाषण केले आणि हा संघ भारतीय क्रिकेट इतिहासातील महान संघ असल्याचे सांगितले. आयसीसी ट्रॉफी जिंकून आम्ही ते अधिक चांगले करू शकलो असतो, पण हा खेळ आहे आणि भविष्यात आम्हाला त्यासाठी संधी मिळेल, असे शास्त्री म्हणाले.
तुम्ही एक संघ म्हणून माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन जिंकलो. आपण प्रत्येक फॉरमॅटमध्ये जिंकलो आणि सर्व संघांना हरवले. यामुळे तुम्ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान संघ आहात. या संघाने गेल्या पाच-सहा वर्षांत उत्तम खेळ दाखवला आहे, असे शास्त्री ड्रेसिंगरूममध्ये म्हणाले.
गेल्या पाच-सहा वर्षांत या संघाने कशी कामगिरी केली हे निकालावरून दिसून येते. आपण आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकू शकलो असतो पण तसे झाले नाही आणि हाच खेळ आहे. तुम्हाला आणखी एक संधी मिळेल. तुम्ही पुढच्या वेळी भेटाल तेव्हा तुम्ही अधिक हुशार आणि अनुभवी असाल. माझ्यासाठी आयुष्य म्हणजे तुम्ही जे मिळवता ते नाही, तर तुम्ही अडचणींवर कशी मात करता हे आहे, असे रवी शास्त्री म्हणाले. या भाषणानंतर शास्त्रींनी सर्व खेळाडूंना मिठी मारली.
‘आयपीएल’ आणि विश्वचषकामध्ये अवघ्या दोन दिवसांचा फरक भारताच्या सुमार कामगिरीसाठी कारणीभूत ठरला, असे स्पष्ट मत भारताचे मावळते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…