विराटला अंतिम संघातून वगळणार होते

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०१६ मध्ये भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यानचा विराट कोहलीला संघातून वगळले जाणार होते, असा खुलासा माजी सलामीवीर वीरेंदर सेहवागने केला आहे.


निवड समितीला विराट कोहलीला वगळायचे होते, परंतु मी आणि धोनीने त्याला पाठिंबा दिला. निवड समितीला २०१२मध्ये पर्थमध्ये विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला खेळवायचे होते. मी उपकर्णधार होतो आणि महेंद्रसिंग धोनी संघाचे नेतृत्व करत होता आणि आम्ही ठरवले, की विराटला पाठिंबा द्यायचा. तसे केले, असे सेहवाग म्हणाला. धोनी आणि सेहवागचा हा निर्णय विराटच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला आणि तेव्हापासून त्याला एकदाही संघातून वगळण्यात आलेले नाही. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४४ धावा केल्या आणि त्यानंतर ७५ धावा केल्या. भारताने हा सामना एक डाव आणि ३७ धावांनी गमावला.


कोहलीच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात संस्मरणीय नव्हती. २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या मालिकेत तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ ७६ धावा केल्यानंतर त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले आणि संघात परतल्यानंतरही त्याने आपला बराचसा वेळ पॅव्हेलियनमध्येच घालवला. विराट कोहलीने अखेरीस त्या वर्षीच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत संघात स्थान मिळवले. त्याने ऑस्ट्रेलियाचाही दौरा केला. तिसऱ्या कसोटीपूर्वी विराट पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधील स्थान गमावण्याच्या मार्गावर होता.

Comments
Add Comment

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

संजूची बॅट तळपली, टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली

कोलकाता : ईडन गार्डनवर झालेल्या सुपर आठ फेरीतल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात भारत पाच विकेट राखून जिंकला.

बुमराहसमोर वेस्ट इंडिजचा हेटमायर हतबल

कोलकाता : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा निर्णायक सामना

द. आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ गडी राखून विजय

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातील सुपर आठ फेरीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ५ गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेचा