मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच आता मुंबईत आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा व्हायरस वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे. मात्र मुंबईकरांनी न घाबरता याबाबत काही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा सुरु आहे. मुंबईची परिस्थिती पाहता सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती आहे. आरएसव्ही हा कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस नसून त्यावर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मान्सून संपला असला तरी काही भागात पाऊस पडत आहे. आरएसव्ही व्हायरस हा वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचाच प्रकार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आरएसव्ही व्हायरस नियंत्रणात येऊ शकतो. तसेच कुठलाही ताप असला, तरी उपचार घेणे आवश्यक आहे. त्वचेला खाज येणे, ताप, खोकला ही आरएसव्हीची लक्षणे असून कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असला तरी वातावरण बदलाने व्हायरसची लागण होण्याचा शक्यता अधिक आहे. तर मुंबईकर सध्या वातावरण बदलामुळे ताप- खोकल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच कोरोनासोबतच इतर व्हायरसचीही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने केवळ पाच कोरोना जम्बो सेंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. गरज असेल तिथेच हे वॉर्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…