रामदास कदम निष्ठावान शिवसैनिक आहेत हे कुणी सांगितलं?

Share

नारायण राणेंची जोरदार टोलेबाजी

मुंबई (प्रतिनिधी) : रामदास कदम हे निष्ठावान शिवसैनिक आहेत हे तुम्हाला कुणी सांगितलं. ते किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आलेत हे तुम्हाला माहीत आहे का?,’ असा प्रतिप्रश्न करत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘रामदास कदम हे निष्ठावान शिवसैनिक आहेत, असं तुम्हाला कुणी सांगितलं? किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आलेत ते तुम्हाला माहीत नाही. त्यामुळं त्यांच्या विषयी प्रश्न विचारू नका,’ असं राणे म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना बाहेर राहण्याचा अधिकार नाही, ते तुरुंगातच असायला हवेत, असंही राणे यावेळी म्हणाले.

अँटिलिया प्रकरणात कोठडीत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यानं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस अधिका-यांच्या बदल्यांच्या प्रकरणात अनिल परब यांना तब्बल २० कोटी रुपये मिळाल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यानंतर अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. त्याशिवाय, परब यांच्यावर अनधिकृत बांधकामाचेही आरोप आहेत. त्याबाबतची माहिती रामदास कदम यांनीच एका आरटीआय कार्यकर्त्यामार्फत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता.

रामदास कदम व आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांच्यातील ऑडिओ संभाषणही व्हायरल झालं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणंही टाळलं होतं. कदम यांनी स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले असून शिवसेना कधीही सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याच अनुषंगानं पत्रकारांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला राणे यांनी आपल्या खास स्टाइलनं उत्तर दिले.

Recent Posts

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

2 minutes ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

3 minutes ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

11 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

22 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

30 minutes ago

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…

39 minutes ago