सावंतवाडीत पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी

Share

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. दिवाळीचा सण असल्याने खरेदीसाठी फुललेल्या बाजारपेठेवर परतीच्या पावसामुळे विरजण पडले, तर नरक चतुदर्शीच्या पार्श्वभूमीवर शहरात बनवलेले नरकासुराचे देखावे मात्र भिजून गेले.

मंगळवारी सायंकाळी अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तसेच विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती, तर त्यानंतर रात्रभर अधून मधून पावसाच्या रिमझिम सरी सुरूच होत्या. मात्र, या पावसाच्या सरीत भिजत नागरिक दिवाळी सणाच्या सामानांची खरेदी करताना दिसत होते, तर धनोत्रयोदशी असल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा जास्त कल दिसून येत होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पुन्हा झालेल्या पावसाने मात्र दिवाळीचे सर्वच चित्र बदलून टाकले. गेल्या काही दिवसांत पडलेली थंडी देखील गायब झाली व प्रचंड उष्मा वाढला. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, तर दमट वातावरणात उष्णतादेखील जाणवत होती. त्यामुळे सायंकाळी पाऊस येणार याची सर्वांनाच खात्री होती.

त्याप्रमाणे सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल अर्धा तास पाऊस अक्षरशः झोडपत होता. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांना दुकान शेडचा आसरा घ्यावा लागला, तर छत्री, रेनकोट नसलेल्या नागरिकांनी अखेर भिजत जाण्यास पसंती दिली. मात्र, या पावसाचा मोठा परिणाम व्यापारी वर्गावर होण्याची शक्यता आहे.

फुललेले मार्केट ह्या पावसाने मात्र सुनेसुने करून टाकले. शहरात घराघरांत तसेच ग्रामीण भागात धनत्रयोदशी दिवशी करण्यात आलेली विद्युत रोषणाई तसेच कंदील भिजून गेले. ग्रामीण भागात तर भातशेतीचे देखील नुकसान झाले. असाच पाऊस पडत राहिल्यास तोंडाशी आलेला घास नासाडी होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Recent Posts

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

4 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

12 minutes ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

59 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

1 hour ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

3 hours ago