ईशान्य भारतात भाजपची सरशी

Share

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने देशातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योगपती, नोकरदार आदी सर्वच वर्गातील घटकांकडे लक्ष पुरवून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याकडे पुरेपूर लक्ष दिल्याने हे सर्व घटक सतत पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. मोदी सत्तेवर आल्यापासून जेव्हा जेव्हा निवडणुका, पोटनिवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचाच म्हणजे मोदींच्याच नेतृत्वाचा विजय झालेला दिसला. म्हणजेच देशापुढे मोदींच्या कणखर, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाशिवाय आणि भाजपशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय सध्या तरी नाही, असाच मथितार्थ काढला, तर तो वावगा ठरणार नाही. देशातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रासह १३ राज्यांतील २९ विधानसभा जागांवर शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी मंगळवार २ नोव्हेंबर रोजी झाली. त्यानुसार भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण १५ जागांवर म्हणजे २९ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे ईशान्य भारतातील राज्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची सरशी झालेली दिसत आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने पाचही जागांवरील पोटनिवडणूक जिंकली आहे. मध्य प्रदेशात भाजपने तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघ आणि खांडवा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. बिहारमध्ये, जनता दल युनायटेडने तारापूर आणि कुशेश्वर अस्थान या दोन्ही जागा जिंकल्या. कर्नाटकमध्ये भाजपने सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे, तर हंगल मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्व चार जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे विधानसभेच्या एकूण २९ जागांपैकी काँग्रेसला केवळ आठ जागांवर आपला झेंडा रोवता आला आहे. तरी सर्वात जुन्या पक्षाचे नेते आणि काही कार्यकर्ते या विजयाने हुरळून गेले आहेत.

या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण यापुढे काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून या निवडणूक निकालांच्या माध्यमातून जनतेचा कौल जोखण्यास मदत होणार असल्याने राजकीय जाणकारांचे त्याकडे बारीक लक्ष होते. विधानसभेसोबतच लोकसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणूक झाली. यामध्ये दादरा आणि नगर हवेलीची जागा शिवसेनेने जिंकली तर हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. मध्य प्रदेशातील खांडवा येथील जागेवर भाजपने आपला झेंडा फडकवला. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर (राखीव) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे ४० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. दादरा – नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले सेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. डेलकर यांच्या खासदार पतीने मुंबईत आत्महत्या केल्याने ही पोटनिवडणूक झाली व या निवडणुकीत सेनेला सहानुतीच्या लाटेचा फायदा मिळाला असेच म्हणावे लागेल. एकूणच या पोटनिवडणुकीत देशातील वाढत्या महागाईच्या मुद्दयाचा थोडाबहुत फटका भाजपला बसला असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे भाजप नेतृत्व महागाईसारख्या मुद्दयाकडे विशेष लक्ष देईल असे दिसते.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे सामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कटिबद्ध असल्याने यापुढील बहुतेक सर्वच निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा निश्चित आहे. पण थोडी सावधगिरी ही बाळगावीच लागेल.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago