क्लीनअप मार्शलकडून लोकांना त्रास सुरूच

Share

मुंबई (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीत क्लीनअप मार्शलची दादागिरी सुरू असल्याची तक्रार मुंबईकर करत आहेत. मुंबईत दिवाळीनिमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे; मात्र या गर्दीत कोरोना नियम मोडू नये यासाठी क्लीनअप मार्शल मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत. मात्र या क्लीनअप मार्शल सोबत मुंबईकरांचे वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिवाळीनिमित्त मुंबईतील दादर, मस्जिदबंदर, कॉफर्ड मार्केट या सगळ्याच बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मात्र या गर्दीत मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शल तैनात असल्याचे दिसत आहेत. मात्र या क्लीनअप मार्शलची दादागिरी सुरू असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. जर एखाद्या व्यक्तीने काही सेकंदासाठी देखील मास्क खाली केला असेल तरी त्या नागरीकाकडून दंड आकारला जात असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्यासोबत वाद करताना केवळ एक नाही तर सगळेच क्लीनअप मार्शल घोळक्याने जमा होत असून वाद घालत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

क्रॉफर्ड मार्केट परिसरात देखील एकाच ठिकाणी क्लीनअप मार्शल घोळक्याने उभे आहेत. केवळ सामान्य नागरिकांवर कारवाई करत वाद घालत आहेत. मात्र तिथेच विना मास्क उभ्या असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याचे पाहायला मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान क्लीन अप मार्शलसोबतचे वाद वाढतच असल्याचे दिसते.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

4 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

6 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago