दुबई (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सुपर-१२ फेरीतील (ग्रुप २) बुधवारच्या (३ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध न्यूझीलंडचे पारडे जड आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या अपयशी सलामीनंतर न्यूझीलंडने भारतावर मात करताना वेळीच पुनरागमन केले. किवींच्या खात्यात दोन सामन्यांनंतर दोन गुण आहेत. सेमीफायनलचे आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात स्कॉटलंडविरुद्ध करावी लागेल.
दोन सामन्यांनंतर किवींच्या एकाही बॅट्समनला अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. सर्वाधिक ४९ धावा डॅरिल मिचेलच्या आहेत. त्याने भारताविरुद्ध ही खेळी केली. कर्णधार केन विल्यमसनने थोडा प्रतिकार केला तरी डेवॉन कान्व्हे, मार्टिन गप्टिलला अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. गोलंदाजी तितकी प्रभावी नसली तरी लेगस्पिनर ईश सोढी तसेच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (दोन सामन्यांत प्रत्येकी चार विकेट) बऱ्यापैकी बॉलिंग करताना भारताविरुद्धच्या विजयात खारीचा वाटा उचलला आहे.
स्कॉटलंडकडून रिची बेरिंग्टनने एक अर्धशतक झळकावले आहे. क्रॉस आणि ग्रीव्हज यांनीही थोडा प्रतिकार केला आहे, मात्र गोलंदाजी तितकी प्रभावी ठरत नाही.
वेळ : दु. ३.३० वा.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…