मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जाणार आहे. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्या पाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री (सांताक्लॉज) अनिल परब यांचा नाताळ कोठडीत गेला तर आश्चर्य नको. पत्रात नाव असल्याने त्यांची चौकशी व्हायलाच हवी, असे आमदार नितेश राणे यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी देशमुख यांच्या अटकेनंतर म्हटले आहे.
नितेश राणे यांनी फेसबुकद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनी लाँड्रिंग प्रकरणाची खोली स्पष्ट केली. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले होते, असे अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी म्हटल्याचे ईडीला मिळालेल्या पत्रात नमूद आहे. आपल्या मंत्र्यांनी नेमके काय अवगत करून दिले, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन द्यायला हवी. त्यामुळे ईडीला केस लवकर सोडवण्यात आणखी मदत होईल, असे नितेश राणे पुढे म्हणाले.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय, हा आरोप खोटा आहे. आम्ही यांना १०० कोटी वसूल करण्यास सांगितले. जावयांना ड्रग्ज पुरवण्यास सांगितले होते का? आम्ही वसुली करण्यास सांगितले होते का? तुम्ही वसुली करायची. बारमालकांकडून हप्ते गोळा करायचे. मात्र, केंद्रीय यंत्रणांनी त्यावर लक्ष ठेवले की, केंद्र सरकारवर खापर फोडायचे. तुम्ही वसुली करायची आणि नाही पचली म्हणून दुसऱ्यांना दोषी धरायचे? त्यापेक्षा वसुली करायची नव्हती. पारदर्शक कारभार करायचा होता. मग आम्ही तसेच केंद्रीय यंत्रणा तुमच्या मागे लागलो नसतो. तुम्ही लुटमार सुरू केली तर कारवाई होणारच. त्यात भाजपला दोष देण्यात काय अर्थ, असे राणे म्हणाले.
परमबीर हे देश सोडून पळाले आणि सध्या बेल्जियममध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते महाराष्ट्र सोडून कसे गेले याचे उत्तर आधी दिले गेले पाहिजे. परमबीर सिंह कुणाचे लाडके? सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी तुम्हाला ते हवे होते. तुमची घाण साफ करायला त्यांची गरज भासली. परमबीर हे पोलीस आयुक्त असताना सर्वात जास्त वेळा आदित्य हे सीपी कार्यालयात जात होते. त्यामुळे त्यांना परमबीर यांच्याबद्दल माहिती नाही, हे कसे शक्य आहे?
फोर सीझन्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्यांबद्दल सर्व माहिती पर्यावरण मंत्र्यांना आहे, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घ्यावी, असा सल्ला त्यांनी नवाब मलिकांना दिला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावर भाजपचे नेते, आमदार राणे यांनी मलिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…