दहशतवादावर अंकुश ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरमधील दहशतवादावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गृह विभागाकडून जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएच्या धर्तीवर राज्य तपास यंत्रणा(एसआयए) गठीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

एसआयए यंत्रणा एनआयए आणि केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून काम करेल. राज्य तपास यंत्रणेची स्थापना दहशतवादावर अंकुश राखण्यासाठी करण्यात आली आहे. ही यंत्रणा दहशतवादाशी निगडीत सर्व घटनांचा प्रभावीपणे तपास करण्यासोबतच, कारवाई देखील करेल.

राज्याच्या गृहविभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार, एसआयएमध्ये एक संचालक असेल, तर यामध्ये अधिकारी व कर्मचारी हे सरकारकडून नियुक्त केले जातील. सीआयडी प्रमुख यंत्रणेचे मानद संचालक असतील. मूळ वेतनाच्या २५ टक्के विशेष प्रोत्साहन भत्ता एसआयएमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना दिला जाईल. या आदेशात म्हटले आहे की, सर्व स्टेशन प्रभारी दहशतवादाशी संबंधित खटल्यांच्या नोंदीबाबत एसआयएला तत्काळ माहिती देतील. सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांना आर्थिक मदत, बनावट नोटांचे संचालन, दहशतवादी कट प्रकरणे, दहशतवादाशी संबंधित एनडीपीएस प्रकरणे, अपहरण आणि खून, दहशतवादाशी संबंधित चोरी, खंडणी, एटीएम आणि बँक लुटणे, शस्त्रे लुटणे, अपप्रचार आणि भारत सरकारच्या विरोधात खोटा प्रचार इत्यादी प्रकरणांची चौकशी ही यंत्रणा करेल.

तपासादरम्यान दहशतवादाबाबत थोडीशी माहिती मिळाली तर त्याबाबत कळवावे लागेल. गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची प्रगती आणि इतर बाबी लक्षात घेऊन डीजीपी कोणत्याही प्रकरणाचा तपास एसआयएकडे सोपवू शकतात. एसआयएकोणत्याही प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन एफआयआर नोंदवू शकते, परंतु त्याची माहिती डीजीपीला द्यावा लागेल.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

54 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago