मुंबई (प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिंदुस्तानला ‘‘रन फॉर युनिटी’’चा नारा दिला. याच धर्तीवर उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी #वॉकफॉरस्लमफ्री मुंबईचा नारा देत उत्तर मुंबईच्या ६ विधानसभा मतदार संघातून संकल्प यात्रा सुरू केली. सकाळी ८ वाजता बोरिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातून खासदार गोपाळ शेट्टी यांनी या यात्रेस प्रारंभ केला.
कांदिवली एज्युकेशन सोसायटीच्या आवारात असलेली सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा असलेल्या चौकात सर्व ठिकाणीच्या यात्रा एकत्र झाल्या. हजारोंच्या संख्येने नागरिक आणि भाजप कार्यकर्ते या संकल्प पदयात्रेत सहभागी झाले होते. खासदार गोपाळ शेट्टी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी बोलताना खासदार शेट्टी यांनी आपण मुंबईतील रखडलेल्या एसआरए योजना पुन्हा कार्यान्वित व्हाव्यात यासाठी देत असलेल्या लढ्यासंदर्भात व प्रयत्नांसंदर्भात माहिती देताना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हाडा, एसआरए प्राधिकरण व संबंधित खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना प्रत्यक्ष भेटून आपण चर्चा केली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
या संकल्प पदयात्रेत आमदार भाई गिरकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे तसेच उत्तर मुंबईतील नगरसेवक व मोठ्या प्रमाणात नागरिक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी आभार प्रदर्शन केले.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…