प्रभाग फेररचनेविरोधात भाजपचे आंदोलन

Share

सीमांकनात नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिकेने तयार केलेल्या प्रभागांच्या फेररचनेच्या सीमविरोधात भाजपने सोमवारी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. सर्व नियम धाब्यावर बसवून हे सीमांकन करण्यात आले असून या घोटाळ्याविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना गुलाबपुष्प देत आंदोलन केले. तसेच आयुक्तांच्या संगनमताने प्रभागाच्या फेररचनेच्या मसुद्याचा पेनड्राईव्ह रातोरात बदलला, असा आरोप भाजपने केला आहे. या विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी महानगर पालिका मुख्यालया बाहेरही निदर्शने केली.

दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. यात शिवसेनेने एका बाह्य खासगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा आरोप भाजपने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या फेररचना मोठ्या प्रमाणात राजकिय सोयीसाठी बेकायदेशीररीत्या फेरफार करण्यात आला असून ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे, तर पश्चिम उपनगरातील देखील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

सत्ताधारी पक्षाने नवीन प्रभाग फेररचना केवळ राजकीय फायदा पाहून केली असून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच केली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी अशी मागणी भाजपने आयुक्तांना पत्र देत केली आहे.

अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच याबाबत भाजप न्यायालयात देखील जाईल, असा इशारा भाजपने दिला आहे.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

21 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

2 hours ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

3 hours ago