Share

दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात; नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज

गौसखान पठाण

सुधागड-पाली : अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथे कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. शहरात नगरपंचायतीच्या घंटागाड्या फिरून देखील काही नागरिक फुटक्या कचरा कुंड्यांमध्ये आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीतर्फे ४ वर्षांपूर्वी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या नगरपंचायतीकडे ४ घंटागाड्या कार्यरत आहेत.

या घंटागाड्या येथील विविध भागात फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून रविवारीच फक्त घंटागाड्या येत नाहीत. त्यानंतर सोमवारी अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्या व रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग पडलेला असतो, तर इतर दिवशी देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार तसेच अनेक जण घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच कचरा कुंड्यांमध्ये व रस्त्यांवर टाकतात, तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा आजूबाजूच्या कचरा कुंड्यांमध्ये किंवा रस्त्यावर टाकून देतात. परिणामी कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’च राहते. त्यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजूच्या गटारात पडते आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.

अपुरे सफाई कर्मचारी

पाली नगरपंचायतीकडे अधिकृत १५ ते १८ सफाई कर्मचारी आहेत. मात्र, पगार कमी व सेवासुविधांचा अभाव यामुळे प्रत्यक्षात जेमतेम ९ ते १० कर्मचारी रोज कामावर येतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई करणे त्यांना शक्य होत नाही.


नजीकच्या काळात पालीतील सर्व कचराकुंड्या बंद करणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी घंटागाडीमध्येच कचरा टाकावा. कचराकुंडीत कचरा टाकला तरी तो बाहेर पडू देऊ नये. नागरिकांनी शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गाव स्वच्छ व सुंदर राहील. नागरिकांनी देखील योग्य कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे. – दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली नगरपंचायत


पालीत घंटागाडी नियमित फिरत असूनही काही नागरिक नादुरुस्त कचरा कुंड्यामध्ये व रस्त्यावर आपला कचरा टाकतात. परिणामी कोरोना काळात आजारांना निमंत्रण देतात. घंटागाडी असताना कचराकुंडीची गरजच नाही. नगरपंचायतीने नागरिकांना घंटागाडीचा वापर करण्यासाठी जनजागृती व नियोजन करावे. तसेच डम्पिंग ग्राऊंड सुद्धा बंदिस्त असावे. – कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

Recent Posts

Ravindra Jadeja : रोहित-विराटनंतर रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…

11 hours ago

Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…

12 hours ago

Belapur News : बेलापूर गावात भाजपाचा विकास कामाचा पाहणी दौरा!

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…

12 hours ago

New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…

13 hours ago

Sujata Saunik : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान!

सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…

13 hours ago

Pune news : अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराच्या लेंड्या!

पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…

14 hours ago