वसई-विरारमधील सिग्नल नादुरुस्तच

कीर्ती केसरकर


नालासोपारा : गेल्या दोन वर्षांपासून सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वसईमध्ये सुरू आहेत. अजूनही त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. सिग्नल केंद्रांमध्ये होणाऱ्या गोंधळामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी वाढली आहे. मुख्य रस्त्यांवरील सिग्नल सतत बंद असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. शिवाय, वाहतूक कोंडीतही प्रचंड वाढ झालेली आहे.


वसई-विरार विकसित होत असताना येथे गर्दीही वाढत आहे. त्यामुळे शहराला वाढत्या वाहतूक कोंडीचा त्रास जाणवू लागला होता. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वसई तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, दोन वर्षांपासून सिग्नल यंत्रणा योग्यरीत्या सुरू नाही. या संपूर्ण समस्येची चर्चा सुरू असली तरी यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाहीत. गेल्या काही महिन्यांत आणखी काही मुख्य परिसरांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; परंतु नवीन यंत्रणा बसवण्यात आली असली तरी जुन्या सिग्नलप्रमाणेच नवीन सिग्नल यंत्रणाही सतत बंद पडत आहे. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले असून वाहतूक कोंडीची परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत चालली आहे. त्यातही वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहतुकीचे नियम मोडत वाहनचालक फिरत आहेत.


सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीवर पालिका लक्ष देत नसल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढले आहेत. याचबरोबर वसई विकसित होत असल्याने या ठिकाणी लोकसंख्यासुद्धा वाढत आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी सिग्नल यंत्रणेवर लक्ष देणे गरजेचे आहे. दररोज प्रवासाच्या वेळी सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड झालेला असतो. यामुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तरीही वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये त्यात सुधारणा होत नसल्याचेच दिसते. अनेकदा विषय उचलण्यात आला तरीही सिग्नल बदलण्यात किंवा ते दुरुस्त करण्यात आले नाहीत. वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी बसवण्यात आलेले सिग्नल आता निकामी ठरत आहेत. तसेच, सतत बंद असणारे सिग्नल अधिकच वाहतूक कोंडी वाढवत आहेत. त्यामुळे या बिघडलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वसई-विरारकर वाहनचालकांची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची