नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘देशाला आर्थिक विकासाकडे नेणाऱ्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी तरुणांना सहभागी करून घ्या’, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे बुधवारी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील जागरूकता कार्यक्रम ‘संभव’चा त्यांनी प्रारंभ केला. बंधित व्यवसाय किंवा क्षेत्रांना चालना देण्यासाठी नवोदित उद्योजकांनी तयार केलेली नवीन उत्पादने आणि सेवा एक लाभदायी परिणाम देऊ शकतात, यावर त्यांनी भर दिला. मंत्री महोदय राणे यांच्यासमवेत राज्यमंत्री
भानुप्रताप सिंग वर्मा आणि एमएसएमईचे सचिव बी. बी. स्वेन हे उपस्थित होते. यावेळी बोलताना भानुप्रताप सिंग वर्मा यांनी स्थूल राष्ट्रीय उत्पादन, जीडीपी सध्याच्या ३० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवणे आणि एमएसएमई क्षेत्रातील रोजगार निर्मिती ११ कोटींवरून १५ कोटींवर नेणे यावर भर दिला. भविष्यात भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम एक महिना चालणारा उपक्रम आहे. ज्यामध्ये देशाच्या सर्व भागांतील विविध महाविद्यालये,आयटीआय (तंत्रशिक्षण संस्था)मधील विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या १३० क्षेत्रीय कार्यालयांद्वारे उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले जाईल.
मोहिमेदरम्यान एमएसएमई मंत्रालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची दृकश्राव्य चित्रफितींच्या सादरीकरणाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याबद्दल जागृती केली जाईल. देशभरातील १,३०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये हे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. यात १,५०,००० विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…