परमबीर सिंग यांचे वेतन थांबवले

  20

मुंबई : गृह विभागाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कारवाई करत परमबीर सिंग यांना दिले जाणारे वेतन रोखले असल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. परमबीर यांच्यावर खंडणी तसेच बेकायदेशीर कृत्य, ॲट्रॉसिटीअंतर्गत मुंबई, ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.


यासंबंधी चौकशीसाठी पोलीस विभागाकडून वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र अद्यापही परमबीर सिंग नेमके कुठे आहेत? याबाबत राज्य सरकारला कोणतीच माहिती नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना राज्याचे तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये अवैधरीत्या जमा करण्याचा आरोप पत्राद्वारे परमबीर यांनी केला होता.


या आरोपानंतर परमबीर बेपत्ता असल्याची चर्चा आहे. परमबीर सिंग यांची मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पदावरून उचलबांगडी झाली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागांमध्ये बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही. पदभार स्वीकारण्याआधीच त्यांनी आठ दिवसांची आणि त्यानंतर १५ दिवसांची रजा घेतली. मात्र त्या रजा संपल्यानंतरही परमबीर सिंग पदावर रुजू झाले नाहीत.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र