‘भारत जेतेपदासाठी अजूनही दावेदार’

Share

दुबई : अपयशी सलामीनंतर भारताचा संघ यूएईत सुरू झालेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला वाटते.

सलामीला भारतापेक्षा पाकिस्तानची सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी झाली. भारताने तीन स्पिनर्ससह खेळवायला हवे होते. मात्र, अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीसारखे असताना तीन वेगवान गोलंदाजांसह खेळणे पसंत केले. त्यांना अपेक्षित गोलंदाजी करता आली नाही. त्यांच्या खराब कामगिरीपेक्षा पाकिस्तानच्या बॉलर्सनी अप्रतिम मारा केला. त्यांना विजयाचे क्रेडिट जाते. शाहीन शाह आफ्रिदीसह पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांनी तिखट मारा केला तरी कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर टिकून राहताना शानदार अर्धशतक झळकावले. लोकेश राहुलला चेंडू अजिबात कळला नाही. रोहित शर्माने थोडा संयम दाखवायला हवा होता. फलंदाजांचे अपयश समजता येऊ शकते. मात्र, गोलंदाजांचे अपयश जिव्हारी लागले. मात्र, अजून चार सामने आहेत. त्यात खेळ उंचावून भारत पुन्हा एकदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावेल, असा विश्वास ब्रेट लीने व्यक्त केला.

उर्वरित सामन्यांत दडपड झुगारून खेळल्यास भारताची वाटचाल सोपी होईल. कारण त्यांच्याकडे चांगले क्रिकेटपटू आहेत. फायनलबाबतचे भाकीत वर्तवणे कठीण आहे. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना व्हावा, असे ब्रेट ली याला वाटते.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

19 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

2 hours ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

3 hours ago