बांबूपासून बनवलेल्या आकाशकंदिलांना मोठी मागणी

Share

संजय नेवे

विक्रमगड : दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिव्यांना या सणात विशेष महत्त्व असते. दीप, दिवे, पणत्या आणि आकाशकंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी जवळ आल्याने सर्वांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. अशातच विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावात टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्यता महिला समूह सध्या बांबूकलेत रमला आहे. दिवस-रात्र काम करून अतिशय सुबक व बारीक काम, उत्तम पद्धतीचे बांबू, रंगसंगती व नक्षीकाम असलेले आकाशकंदील बनवण्यात व्यस्त आहेत.

विविध प्रकारचे हाताने नक्षी काम केलेले १० प्रकारचे आकाशकंदील बनवले जात आहेत. मुंबई तसेच इतर भागांत विविध प्रकारचे हस्त नक्षीकाम केलला एक आकाशकंदील ३०० ते ८०० रुपयांना विकला जात आहे. एक आकाशकंदील बनवण्यासाठी एका महिलेला एक दिवस लागतो. आतापर्यंत या गटाने ७०० ते ८०० आकाशकंदील विकले असून दोन हजार कंदिलांची मागणी असल्याचे येथील महिलांनी सांगितले. तसेच, बांबूपासून बनवलेले व सुबक हस्तकलेने नक्षीकाम केलेले २०० आकाशकंदील अमेरिका येथे पाठवण्यात आल्याची माहिती टेटवाली ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग भुरकूड यांनी दिली. सध्या शेतीची कामे सर्वत्र सुरू असूनही येथील महिला रात्री व आराम करण्याच्या वेळेत एकत्र येऊन सुबक आकाशकंदील तयार करत आहेत.

पूर्ण ताकतीने हा व्यवसाय घर व शेती सांभाळून करत आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यात या कलेने सहकार्य केले असून पुढील काळात वेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवण्याचा मानस आहे. – नमिता नामदेव भुरकूड, अध्यक्षा, टेटवाली बांबू हस्तकला स्वयंम सहाय्य्यता महिला समूह

बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनवल्या जात आहे. दिवाळी आल्याने आकाशकंदिलांना खूप मागणी आहे. हे कंदील अमेरिकेत पाठवण्यात आले असून विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू इंग्लड, आस्ट्रेलिया व इतर देशांत निर्यात केल्या जातात. -पांडुरंग काशिनाथ भुरकूड, उपसरपंच, टेटवाली ग्रामपंचायत

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 minute ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

49 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

1 hour ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

3 hours ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

8 hours ago