१०० दिव्यांग लाभार्थींना मिळाले कृत्रिम हात

मुंबई : ग्रँड मराठा फाउंडेशन आणि इनालि फाउंडेशनच्या माध्यमातून १६ ते ६० वर्षे या वयोगटातील १०० दिव्यांग लाभार्थींना कृत्रिम हात मोफत पुरविण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. रोहित शेलटकर (संस्थापक, जीएमएफ), माधवी शेलटकर (विश्वस्त, जीएमएफ) आणि प्रशांत गाडे (संस्थापक, इनालि फाउंडेशन) यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.


या उपक्रमाविषयी माहिती देताना चित्रपट निर्माते आणि ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले, कृत्रिम हातामुळे लाभार्थी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. मर्यादित आर्थिक स्रोत असलेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांनी पुढे यावे आणि फाउंडेशनशी जोडले जाऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रँड मराठा फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तसेच 'गरजूंचे सबळीकरण' या कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी दात्यांनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://grandmaratha.org/ या वेबसाइटला भेट द्यावी.

Comments
Add Comment

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'बाहेर कडेकोट बंदोबस्त!

'मातोश्री'वर ड्रोन दिसल्यानंतर पोलिसांची खबरदारी मुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या

दिल्ली हादरताच मुंबईत 'हाय अलर्ट'! रात्रीची गस्त वाढवली; रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बाजारात कडक बंदोबस्त

 लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर आठ ठार; सुरक्षा यंत्रणा सतर्क मुंबई : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ

इच्छुकांच्या ह्दयात धडधड आणि पोटात भीतीचा गोळा; माजी नगरसेवकांसह सर्वांचे देवाला साकडे

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता २२७ प्रभागांची आरक्षण लॉटरी सोडत मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई

महानगरपालिकेच्‍या अतिधोकादायक न्‍यू माहीम शाळेचा पुनर्विकास, पुन्हा त्याच ठिकाणी बांधणार शाळा

मुंबई (खास प्रतिनिधी) : न्‍यू माहीम महानगरपालिका  मराठी माध्यमाची शालेय इमारत धोकादायक दाखवून ती पाडली जाते. या

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम