वसईमध्ये रस्त्यांच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य

Share

कीर्ती केसरकर

नालासोपारा : गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा निर्माण झालेली पूरस्थिती, नागरिक व पर्यटकांकडून अस्ताव्यस्त टाकण्यात येणारा कचरा यामुळे वसई-विरारच्या मुख्य रस्त्यांच्या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जाताना शेकडो वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रोजच कचरा टाकला जात असताना वसई-विरार महापालिकेकडून कोणतीच दखल घेतली जात नाही आहे. परिणामी त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे.

सामान्य नागरिक नालासोपारा, वसई गाव, निर्मळ, भुईगाव, गिरीज, विरार, सोपारा रोज या मार्गांचा वापर करतात. तसेच याठिकाणी पर्यटन स्थळेसुद्धा भरपूर असल्याने पर्यटकांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत येथील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुर्गंधी व विविध आजार पसरण्याची शक्यता आहे. या वर्षी पावसाळ्यात अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाण्यातून वाहून आलेला कचरा रस्त्याच्या किनाऱ्यावर येऊन अडकला आहे. महानगरपालिकेने अजूनही तो उचलून रस्त्याची स्वच्छता केलेली नाही. पर्यटक या ठिकाणी फिरण्यास येतात मात्र, कचरा बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला टाकून निघून जातात. याचबरोबर रहिवासी व इतर नागरिकांना कचरा, कचरा कुंडीत टाकण्याचा आळस आला तर ते रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात.

तसेच, कचरा उचलण्यासाठी पालिकेची कचरा उचलणारी गाडी नियमित वेळेत येत नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहे. बाजारातील कुजलेल्या भाज्या, टाकावू वस्तू याचा सर्वाधिक त्रास इथून जाणाऱ्या वाहन चालकांना होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांना व नागरिकांना येथून जाताना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वसई-विरार महापालिका करत असली तरी मात्र या ठिकाणचा कचरा उचलला जात नाही व जे कचरा टाकतात त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे त्यांचे
फावत आहे.

वाढत्या कचऱ्याने दुर्गंधीचा त्रास

महानगरपालिका कचरा पसरवणाऱ्या पर्यटक व नागरिकांवर कठोर कारवाई करत नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच नागरिकांना पूरस्थितीमुळे साठलेला कचरा पालिका स्वछ करत नसल्याने कचरा कुजून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरू लागली आहे. पालिकेने त्वरितच कचऱ्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

10 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

28 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

29 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago