वसईमध्ये रस्त्यांच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य

Share

कीर्ती केसरकर

नालासोपारा : गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा निर्माण झालेली पूरस्थिती, नागरिक व पर्यटकांकडून अस्ताव्यस्त टाकण्यात येणारा कचरा यामुळे वसई-विरारच्या मुख्य रस्त्यांच्या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जाताना शेकडो वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रोजच कचरा टाकला जात असताना वसई-विरार महापालिकेकडून कोणतीच दखल घेतली जात नाही आहे. परिणामी त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे.

सामान्य नागरिक नालासोपारा, वसई गाव, निर्मळ, भुईगाव, गिरीज, विरार, सोपारा रोज या मार्गांचा वापर करतात. तसेच याठिकाणी पर्यटन स्थळेसुद्धा भरपूर असल्याने पर्यटकांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत येथील रस्त्यांच्या कडेला कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुर्गंधी व विविध आजार पसरण्याची शक्यता आहे. या वर्षी पावसाळ्यात अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाण्यातून वाहून आलेला कचरा रस्त्याच्या किनाऱ्यावर येऊन अडकला आहे. महानगरपालिकेने अजूनही तो उचलून रस्त्याची स्वच्छता केलेली नाही. पर्यटक या ठिकाणी फिरण्यास येतात मात्र, कचरा बिनधास्तपणे रस्त्याच्या कडेला टाकून निघून जातात. याचबरोबर रहिवासी व इतर नागरिकांना कचरा, कचरा कुंडीत टाकण्याचा आळस आला तर ते रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात.

तसेच, कचरा उचलण्यासाठी पालिकेची कचरा उचलणारी गाडी नियमित वेळेत येत नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहे. बाजारातील कुजलेल्या भाज्या, टाकावू वस्तू याचा सर्वाधिक त्रास इथून जाणाऱ्या वाहन चालकांना होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांना व नागरिकांना येथून जाताना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वसई-विरार महापालिका करत असली तरी मात्र या ठिकाणचा कचरा उचलला जात नाही व जे कचरा टाकतात त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे त्यांचे
फावत आहे.

वाढत्या कचऱ्याने दुर्गंधीचा त्रास

महानगरपालिका कचरा पसरवणाऱ्या पर्यटक व नागरिकांवर कठोर कारवाई करत नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच नागरिकांना पूरस्थितीमुळे साठलेला कचरा पालिका स्वछ करत नसल्याने कचरा कुजून त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरू लागली आहे. पालिकेने त्वरितच कचऱ्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

Recent Posts

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

38 mins ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

38 mins ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

2 hours ago

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

3 hours ago

SSC-HSC Exam : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर…

3 hours ago

Nutrition Food : OMG! शालेय पोषण आहारात आढळले सापाचे पिल्लू

चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली : शालेय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार…

4 hours ago