मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे, याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वानखेडेंच्या पोस्टींगबद्दल मलिक यांनी आरोप केले होते. आता, एनसीबीने हे आरोप फेटाळले असून प्रेसनोट जारी केली आहे. तर, समीर वानखेडे यांनीही आरोप फेटाळत, देशसेवेसाठी तुरुंगात जायलाही तयार असल्याचे म्हटले आहे.
वानखेडे यांनीही सांगितले की, नवाब मलिक खोटारडे आहेत. मी मुंबईतील पोस्टींगसाठी २०१९ मध्ये अर्ज केला होता, हे प्रकरण त्याआधीचे आहे. नुकतेच एनसीबीने पत्रक जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, खंडणी, एक्स्टॉर्शन हे अतिशय खालच्या पातळीचे शब्द आहेत. मी मालदीवला गेलो होतो, पण सरकारची परवानगी घेऊनच गेलो होतो. मी माझ्या कुटुंबासमवेत तिथे गेलो होतो, त्यास ते खंडणी म्हणत असतील तर ते योग्य नाही.
‘मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असेही समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळत त्यांना चॅलेंज दिले आहे. तसेच, गेल्या १५ दिवसांपासून माझ्या दिवंगत आईबद्दल, सेवानिवृत्त वडिलांबद्दल, माझ्या बहिणीबद्दल त्यांनी अतिशय गलिच्छ भाषा वापरली, ते वैयक्तीक टीका करत आहेत. त्यामुळे, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…