पालिकेकडून ३५ अतिक्रमणे जमीनदोस्त

  24

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता बांधकामामध्ये अडथळा ठरत असलेली ३५ अतिक्रमणे पी/दक्षिण विभाग कार्यालयाने जमीनदोस्त केली आहेत. आतापर्यंत पी/दक्षिण विभाग हद्दीतील एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी २,१५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत.


पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी समस्येतून दिलासा देण्यासाठी गोरेगांव - मुलुंड जोडरस्ता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये अडथळा ठरणारी एकूण १०१ अतिक्रमणे निश्चित करुन कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. तर पी/दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील १५० फूट रुंदीच्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाच्या दक्षिणेकडील व चित्रनगरी रस्त्याच्या पश्चिमेकडील अशा एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्ता रेषांमध्ये ही अतिक्रमणे होती.


यापैकी पहिल्या टप्प्यात जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील ५२ अतिक्रमित बांधकामे २ वर्षांपूर्वी काढली गेली. तर दुसऱ्या टप्प्यात ३५ अतिक्रमित बांधकामे हटवण्याची कारवाई पी/दक्षिण विभागाने पूर्ण केली. या कारवाईमुळे २१० मीटर लांबीची रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूची जागा गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर अखेरची शिल्लक असलेली १४ अतिक्रमित बांधकामे लवकरच प्राधान्याने काढण्यात येऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन