कोरोना काळात अन्नदानासाठी १२० कोटींचा खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात कोरोनाकाळात महापालिकेने ३ कोटी ७५ लाख नागरीकांना जेवण पुरवले असून यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. बुधवारी काँग्रेस विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आरोप केल्यानंतर पालिकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली.


लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने तसेच कामगारांवर जेवणाची समस्या आल्याने पालिकेकडून अशांना दोन वेळेच जेवण पुरविण्यात आले होते. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत महानगर पालिकेने ३ कोटी ७५ लाख नागरीकांना जेवण पुरवले होते तर प्रत्येक नगरसेवक प्रभागात रोज अंदाजे ५०० जणांना जेवण दिले जात असल्याची माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. त्यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर काही सामाजिक संस्था अशा प्रकारे जेवण बनवतात. त्यांना हे काम दिले असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही