कोरोना काळात अन्नदानासाठी १२० कोटींचा खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात कोरोनाकाळात महापालिकेने ३ कोटी ७५ लाख नागरीकांना जेवण पुरवले असून यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. बुधवारी काँग्रेस विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आरोप केल्यानंतर पालिकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली.


लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने तसेच कामगारांवर जेवणाची समस्या आल्याने पालिकेकडून अशांना दोन वेळेच जेवण पुरविण्यात आले होते. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत महानगर पालिकेने ३ कोटी ७५ लाख नागरीकांना जेवण पुरवले होते तर प्रत्येक नगरसेवक प्रभागात रोज अंदाजे ५०० जणांना जेवण दिले जात असल्याची माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. त्यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर काही सामाजिक संस्था अशा प्रकारे जेवण बनवतात. त्यांना हे काम दिले असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात