मुंबई (प्रतिनिधी) : खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यापासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बाबतीत राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. परमबीर सिंग यांच्यावर अटकेची कारवाई न करण्याची हमी यापुढे कायम ठेवता येणार नाही, असे राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
परमबीर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिल्याचे त्यांनी म्हटले होते. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विरोधकांच्या दबावामुळे देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या मागे अद्यापही चौकशी यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. मात्र, देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर यांचेही अनेक कारनामे नंतर बाहेर आले. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…