केंद्रीय मंत्री नारायण राणे बदलणार कोकणचे चित्र

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) माध्यमातून कामाला सुरुवात केली असून येत्या दोन वर्षात इथले चित्र बदललेले दिसेल असे प्रतिपादन भाजपा सरचिटणीस निलेश राणे यांनी केले.


येत्या दोन वर्षात हे चित्र बदलण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय जोमाने काम करत असून केरळच्या धर्तीवर किनारपट्टीवर असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उद्योग सुरु होऊन इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी राणे साहेब काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सुरु होताना राणे साहेब मंत्री व्हावेत ही नियतीची इच्छा होती, त्याप्रमाणेच रत्नागिरीतील विमानतळ सुरु होण्यासाठी राणे साहेबांना रत्नागिरीत घेऊन येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात केवळ रत्नागिरी तालुक्यातील कामच रखडले आहे कारण त्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. जोपर्यंत तो थांबत नाही तोपर्यंत हे काम मार्गी लागत नाही असे निलेश राणे म्हणाले. चिपळूण येथील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार काम करत असून जे तिवरे धरणग्रस्तांना इतक्या वर्षात राहायला घरे देऊ शकले नाहीत ते पूरग्रस्तांसाठी काय करणार? असा टोलाही निलेश राणे यांनी विरोधकांना लगावला.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची