सोमय्या यांची अजित पवारांविरोधात ईडीकडे तक्रार

  35

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबतचे कागदपत्र ईडीकडे सादर केले आहेत. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर बेनामी पद्धतीने ताबा मिळवला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यातील घोटाळ्याबाबतचा पुरावा सादर केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिली असून पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी नाव का दिले असा प्रश्न उपस्थित करतानाच, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाल्यापासून हजारो कोटींची माया गोळा केली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी दिलेल्या कागदपत्रांवर चौकशी करत असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.


दरम्यान, अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमैया यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. मात्र किरीट सोमैया हे ईडी कार्यालयात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याआधीही किरीट सोमैया यांनी काही नेत्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार करणाऱ्यांपैकी बरेचसे नेते आज भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्या तक्रारींबाबत किरीट सोमैया यांनी काय केले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.


Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची