सोमय्या यांची अजित पवारांविरोधात ईडीकडे तक्रार

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबतचे कागदपत्र ईडीकडे सादर केले आहेत. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर बेनामी पद्धतीने ताबा मिळवला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यातील घोटाळ्याबाबतचा पुरावा सादर केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिली असून पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी नाव का दिले असा प्रश्न उपस्थित करतानाच, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाल्यापासून हजारो कोटींची माया गोळा केली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी दिलेल्या कागदपत्रांवर चौकशी करत असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.


दरम्यान, अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमैया यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. मात्र किरीट सोमैया हे ईडी कार्यालयात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याआधीही किरीट सोमैया यांनी काही नेत्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार करणाऱ्यांपैकी बरेचसे नेते आज भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्या तक्रारींबाबत किरीट सोमैया यांनी काय केले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.


Comments
Add Comment

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान

महापालिका शाळांमध्ये श्रीमद् भगवत गीता पठण करण्याची भाजपची मागणी

माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी सभागृहातील ठरावाचे स्मरण करत आयुक्तांना दिले पत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी)

केईएम रुग्णालयात आता खिलाडूवृत्तीने होणार उपचार ; दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र , लवकरच स्वतंत्र क्रीडा विभाग करणार सुरु

मुंबई : परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा

मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन