सोमय्या यांची अजित पवारांविरोधात ईडीकडे तक्रार

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबतचे कागदपत्र ईडीकडे सादर केले आहेत. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर बेनामी पद्धतीने ताबा मिळवला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यातील घोटाळ्याबाबतचा पुरावा सादर केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे दिली असून पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी नाव का दिले असा प्रश्न उपस्थित करतानाच, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाल्यापासून हजारो कोटींची माया गोळा केली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी दिलेल्या कागदपत्रांवर चौकशी करत असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.


दरम्यान, अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमैया यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. मात्र किरीट सोमैया हे ईडी कार्यालयात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याआधीही किरीट सोमैया यांनी काही नेत्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार करणाऱ्यांपैकी बरेचसे नेते आज भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्या तक्रारींबाबत किरीट सोमैया यांनी काय केले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.


Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम