वावर वांगणी ते बेहेडपाडा रस्त्याचा साईटपट्टा तुटल्याने प्रवाशांची गैरसोय

जव्हार (वार्ताहर) : जव्हार तालुक्यात १९९२ साली बालमृत्यू घटनेने सर्व परिचित झालेले गाव वावर-वांगणी. या गावात पूर्वी आरोग्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यूसारख्या घटना घडत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन घटनेची दखल घेतली. तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी स्वातंत्र्य जव्हार येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह दहा विविध विभागांची मुख्य कार्यालय देऊन या भागाचा कायापालट केला.


परंतु, आजही या भागांतील काही गावपाडे सुविधांपासून वंचित आहेत. तालुक्यातील वावर ते बेहेडपाडापर्यंतचा रस्ता पावसाळ्यात खचून मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची साईटपट्टी पूर्ण तुटली असून याबाबत अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. अनेक वेळा संबंधितांना सांगूनसुद्धा कोणीही लक्ष देत नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.


सदर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत अंतर्गत उपकेंद्र वावर सेंटर असून या ठिकाणी एखाद्या गंभीर रुग्णाला जव्हारला घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पूर्वी बेहेडपाडा ही बस सेवा सुरळीत सुरू होती. तथापि, रस्ता पूर्ण तुटल्याने सदर बससेवा बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मोठ्या कसरतींना सामोरे जावे लागत आहे.


दरम्यान, सध्या कॉलेज सुरू झाले असून बससेवा बंद असल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी तिथून पायी प्रवास करावा लागत आहे. सदर रस्ता पूर्ण खचला गेल्याने मोटारसायकलवरूनही प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सदर रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्त्याला संरक्षण भिंत बांधावी, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता