डहाणूखाडी पूल बनला मासे सुकवण्याचा ओटा



डहाणू (वार्ताहर) : डहाणू-पालघर तालुक्याला जोडणाऱ्या खोंडा खाडीवर असणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंकडील फुटपाथचा मासळी सुकवण्याचा ओटा केल्याने फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय निर्माण झाली आहे.


डहाणू आणि पालघर तालुक्यांना जोडणाऱ्या धाकटी डहाणूच्या खोंडा खाडीवर ४०० मीटर लांबीचा दक्षिणोत्तर पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंला जनतेला जाण्या-येण्यासाठी दीड मीटर रुंदीचा फूटपाथ आहे. पालघर हे जिल्हा मुख्यालय झाल्याने या पुलावरून हजारो मोठ-मोठ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय, डहाणूच्या रिलायन्स एनर्जीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राख भरून वीस वीस टन वजनाचे डंपर सतत येत जात असतात. त्यामुळे पुलालाच थोका निर्माण झाला आहे,असे असले तरी नागरिक वाहनांच्या भीतीने फुटपाथवरून प्रवास करत असतात.


धाकटी डहाणू येथील काही मच्छीमार महिला या फुटपाथवर बिनदिक्कत करंदी, जवळा, फुकट अशी लहान-लहान मच्छी सुकत टाकून फुटपाथ सतत भरलेला असतो. त्यामुळे सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची आणि संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्यास येणाऱ्या पर्यटकांची फारच अटचण होते. शिवाय, काही लोकांना ह्या सुकत टाकलेल्या माशांचा वास सहन होत नसल्याने त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागतो.


आता तर पुलाच्या उत्तरेकडील तडीयाळे तलावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेवरच बोंबील मासे सुकवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बांबूच्या माळी (ओलाणी) घालून त्यावर बोंबील सुकवले जातात. मात्र, बोटीतून येणारे ओले बोंबीलाच्या राशी या रस्त्यावरच टाकण्यात येतात. त्यामुळे वाहनांना, प्रवाशांना त्रास होतोच, शिवाय सततच्या पाण्याने या रस्त्यावरही खड्डे पडत असतात याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

International Drug Racket Busted : ‘ऑपरेशन क्लीन मुंबई’! १७४५ कोटींचं कोकेन जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईत धडक कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ