हिंदूंना धमकावणाऱ्यांवर कारवाई करा



मुंबई (प्रतिनिधी) : मालवणी विभागात धर्मांध गुंडांकडून हिंदू रहिवाशांना धमकावले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याविरोधात भाजप आमदार नितेश राणे तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी पोलीस ठाण्यात धडक देत पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले.


मालवणी हा मुस्लिमबहुल विभाग असून या अवैध झोपडपट्टीत गुंडांची दहशतही मोठी आहे. या परिसरात राहणाऱ्या हिंदूंना घरे सोडण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप यापूर्वीही हिंदुवादी संघटनांनी केला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी लोढा यांनी या परिसराला भेट देऊन तेथील हिंदू रहिवाशांची भेटही घेतली होती. त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी कारवाईदेखील केली होती.


मात्र त्यानंतरही हिंदूंना धमकावण्याचे प्रकार थांबले नाहीत, अशा तक्रारी आल्याने लोढा व नितेश राणे यांनी परिसरातील भाजप नगरसेवकांसह मालवणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची भेट घेतली. मर्यादेपेक्षा जास्त जोरात वाजणाऱ्या धर्मस्थळांवरील कर्ण्यांची तक्रार करणाऱ्यांनाही त्रास दिला जातो. कर्ण्यांची तोंड त्यांच्याच घरांच्या दिशेने करून मोठ्या आवाजात ते लावले जातात. वस्ती सोडून निघून जाण्यासाठी हिंदूंना धमकावले जाते, अशा तक्रारी असल्याचे या दोघा आमदारांनी पोलिसांना सांगितले.


या प्रकरणी कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर, एकदा तुमच्यावर विश्वास ठेऊन आम्ही वाट पाहू. मात्र पुन्हा काही अनुचित प्रसंग घडल्यास आम्ही येथे येणार नाही. जे काय करायचे ते आम्ही बाहेर करू, असा इशाराही राणे यांनी दिला. या भेटीसंदर्भात राणे व लोढा यांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली असून वरील संभाषणाचे व्हिडियो देखील त्यांच्यातर्फे समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या