अल-अमिरात (वृत्तसंस्था): पापुआ न्यू गिनी संघावर (पीएनजी) १७ धावांनी मात करत स्कॉटलंडने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसलग दुसरा विजय नोंदवला. तसेच चार गुणांसह पहिल्या फेरीत (ब गट गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
स्कॉटलंडचे १६५ धावांचे आव्हान पीएनजी संघाला पेलवले नाही. त्यांचा डाव १९.३ षटकांत १४८ धावांवर आटोपला. पापुआ न्यू गिनीला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यांचे टॉनी उरा, लेगा सायका, अस्साद वाला, चार्ल्स अमिनी आणि सिमॉन अटई स्वस्तात बाद झाले. त्यामुळे ६ बाद ६७ धावा अशी त्यांची अवस्था झाली. सेसे बाऊ (२४ धावा)आणि नॉर्मन वानुआने चांगली खेळी केली. मात्र विजय मिळवून देण्यात अपयश आले. नॉर्मन वानुआ ४७ धावा करून बाद झाला. तिथेच पीएनजीचा पराभव निश्चित झाला. स्कॉटलंडकडून मध्यमगती गोलंदाज जोशुआ डॅवीने ४ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
त्याआधी, स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६५ धावा केल्या. त्याचे क्रेडिट रिची बेरिंगटनला जाते. त्याने ४९ चेंडूंत ७० धावांचे सर्वाधिक योगदान दिले. जॉर्ज मुनसी (१५) आणि काइल कोएत्झर (६) ही सलामी जोडी अपयशी ठरल्यानंतर मॅथ्यू क्रॉस आणि रिची बेरिंगटन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मॅथ्यू क्रॉसने ४५ धावा तर रिची बेरिंगटनने ७० धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात आलेले फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही. एका पाठोपाठ एक करत बाद झाले. कलुम मॅकलेड (१०), मायकल लीक्स (९), ख्रिस ग्रीव्ह (२), मार्क वॅट (०), जोश डॅवे (०) अशी धावसंख्या करून बाद झाले. पापुआ न्यू गिनीकडून कॅबुओ मोरियाने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
स्कॉटलंडचा संघ पात्रता फेरीतील ब गटात दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. स्कॉटलंडच्या खात्यात आता ४ गुण असून धावगती +०.५७५ इतकी आहे. स्कॉटलंडचा गटातील तिसरा आणि अंतिम सामना ओमानविरुद्ध आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…