दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचे नाव

वर्धा (वार्ताहर) : राजकारणात सध्या सर्वत्र आरोप-प्रत्यारोप होत असताना विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मैत्रिची अनोखी कहाणी समोर आली आहे. दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नमूद केले आहे. वर्धा नगरपालिकेच्या कार्यक्रमात सोमवारी गडकरी व मेघे एकत्र होते. यावेळी दस्तुरखुद्द मेघे यांनीच ही माहिती दिली. गडकरी यांच्या कामाचे भरभरून कौतुक करताना, ‘माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून नितीन गडकरी यांचे नाव दिले आहे,’ असे मेघे यांनी यावेळी सांगितले.


वर्ध्याच्या नगरपालिकेत विकासकामाचे ई-भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते. सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केले. नितीन गडकरी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे मेंबर आहेत. माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून मी त्यांचे नाव दिले आहे, असे दत्ता मेघे यांनी सांगितले.


सुमारे एक दशकापूर्वी मेघे कुटुंबात कलह उफाळून आला होता. यानंतर नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला. सुमारे ३ वर्षांपूर्वी मेघे यांच्या मृत्यूपत्रात अटलबहादूरसिंग, गिरीश गांधी आणि नितीन गडकरी यांचा उल्लेख होता. दीड वर्षापूर्वी यात सुधारणा करण्यात आली. आता फक्त नितीन गडकरी यांचे नाव आहे.


दत्ता मेघे हे काँग्रेसच्या तिकिटावर चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर ते काँग्रेसच्याच तिकिटावर राज्यसभेवर निवडून गेले आहेत. नंतरच्या काळात राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक