संस्थानकालीन छत्र्यांचे जीर्ण बांधकाम जमीनदोस्त

जव्हार (वार्ताहर) : जव्हार संस्थानचे राजे तिसरे विक्रमशाह यांनी महालक्ष्मी मंदिराची स्थापना केली होती. मंदिराच्या परिसरात मुकणे राजघराण्यातील पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या राजे विक्रमशाह यांनी दगडी बांधकामात उभारल्या होत्या. मात्र, कोणत्याही प्रकारची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने सोमवारी दि. १८ ऑक्टोबर पहाटे ६ च्या दरम्यान सदर संस्थानकालीन छत्र जमीनदोस्त झाले. त्यामुळे जव्हारकर नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.


जव्हार येथील राजे यशवंतनगर जवळील महालक्ष्मीचे मंदिर हे जागृत स्थान असून तिथे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव आयोजित केला जातो. १८व्या शतकात जव्हारच्या राज घराण्याकडून मातेचे मंदिर बांधण्यात आले असून आजही हे मंदिर जव्हारच्या राज घराण्याच्या मालकीचे आहे. हे जागृत स्थान असल्याने हजारो भाविक येथे भक्तिभावाने येतात व मातेचे जागृकतेचे अनुभव आजही येथील नागरिकांकडून ऐकायला मिळतात.


नवसाला पावणारी एक जागृत देवता म्हणून कोकणातील ‘जव्हारची महालक्ष्मी’ हे स्थान पूर्वी विशाल माळरानावर, निर्जनस्थळी वसले होते. जशी जशी वस्ती वाढू लागली तसा तसा मंदिराचा परिसर वस्तीने वेढला गेला असला तरीही जव्हारच्या राजे यशवंत नगरमधील श्री महालक्ष्मी मंदिराला एक वेगळेच महत्त्व आहे. १९८८ सालापासून सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. ‘रौप्य महोत्सवपूर्ती’ करणाऱ्या या उत्सवाचे यंदा ३३ वे वर्षं आहे.



देखभाल-दुरुस्ती नाही


सदर महालक्ष्मी मंदिर हे जव्हारच्या मुकणे राजघराण्याच्या मालकीचे आहे. मात्र, त्याची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या छत्र्या जमीनदोस्त झाल्या आहेत. देवस्थान ट्रस्टही जुन्या मंदिरांकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जुन्या पिढीतील नागरिकांनी आठवणींना उजाळा दिला.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ