संस्थानकालीन छत्र्यांचे जीर्ण बांधकाम जमीनदोस्त

जव्हार (वार्ताहर) : जव्हार संस्थानचे राजे तिसरे विक्रमशाह यांनी महालक्ष्मी मंदिराची स्थापना केली होती. मंदिराच्या परिसरात मुकणे राजघराण्यातील पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या राजे विक्रमशाह यांनी दगडी बांधकामात उभारल्या होत्या. मात्र, कोणत्याही प्रकारची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने सोमवारी दि. १८ ऑक्टोबर पहाटे ६ च्या दरम्यान सदर संस्थानकालीन छत्र जमीनदोस्त झाले. त्यामुळे जव्हारकर नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.


जव्हार येथील राजे यशवंतनगर जवळील महालक्ष्मीचे मंदिर हे जागृत स्थान असून तिथे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव आयोजित केला जातो. १८व्या शतकात जव्हारच्या राज घराण्याकडून मातेचे मंदिर बांधण्यात आले असून आजही हे मंदिर जव्हारच्या राज घराण्याच्या मालकीचे आहे. हे जागृत स्थान असल्याने हजारो भाविक येथे भक्तिभावाने येतात व मातेचे जागृकतेचे अनुभव आजही येथील नागरिकांकडून ऐकायला मिळतात.


नवसाला पावणारी एक जागृत देवता म्हणून कोकणातील ‘जव्हारची महालक्ष्मी’ हे स्थान पूर्वी विशाल माळरानावर, निर्जनस्थळी वसले होते. जशी जशी वस्ती वाढू लागली तसा तसा मंदिराचा परिसर वस्तीने वेढला गेला असला तरीही जव्हारच्या राजे यशवंत नगरमधील श्री महालक्ष्मी मंदिराला एक वेगळेच महत्त्व आहे. १९८८ सालापासून सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. ‘रौप्य महोत्सवपूर्ती’ करणाऱ्या या उत्सवाचे यंदा ३३ वे वर्षं आहे.



देखभाल-दुरुस्ती नाही


सदर महालक्ष्मी मंदिर हे जव्हारच्या मुकणे राजघराण्याच्या मालकीचे आहे. मात्र, त्याची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या छत्र्या जमीनदोस्त झाल्या आहेत. देवस्थान ट्रस्टही जुन्या मंदिरांकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जुन्या पिढीतील नागरिकांनी आठवणींना उजाळा दिला.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता