दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमित शहांचे ऑपरेशन काश्मीर

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील ताज्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा यांनी ही मोहीम राबवण्यासाठी दिल्लीहून काश्मीरला एक टीम पाठवली आहे. ही स्पेशल टीम दहशतवाद्यांवर काळ बनून कोसळेल. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत आणि त्यांना ठार करत आहेत. दुसरीकडे एनआयएचे पथक दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळत आहे. गुप्तचर विभागाकडून त्यांना माहिती दिली जात आहे. या माहितीवरून दहशतवाद्यांच्या भूमिगत साथीदारांवर आणि अड्ड्यांवर छापे टाकण्यात येत आहेत.

दरम्यान, काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर दहशतवाद्यांचे हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर यंत्रणांची मॅरेथॉन बैठक बोलावली असून या बैठकीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित आहेत. दुपारी २ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंतपर्यंत म्हणजे सलग आठ तासांहून अधिक काळ ते स्वतंत्र बैठका होत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या वार्षिक सभेला ते आधी संबोधित करतील.

या बैठकीत देशाच्या विविध राज्यांचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांच्यासह गुप्तचर विभागाचे प्रमुखही उपस्थित आहेत. निमलष्करी दलाचे प्रमुखही यात सहभागी आहेत. यावेळी परिषदेची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. कारण जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रणनीती बदलत सामान्य नागरिकांची आणि स्थलांतरितांच्या हत्या सुरू केल्या आहेत. दहशतवाद्यांनी तिथे १३ दिवसांत ११ नागरिकांची हत्या केली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये होत असलेल्या या हत्यांसह चीन आणि बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवरही चर्चा होणार असल्याचे समजते.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

7 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

8 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

8 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

8 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

9 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

10 hours ago