दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमित शहांचे ऑपरेशन काश्मीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील ताज्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा यांनी ही मोहीम राबवण्यासाठी दिल्लीहून काश्मीरला एक टीम पाठवली आहे. ही स्पेशल टीम दहशतवाद्यांवर काळ बनून कोसळेल. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत आणि त्यांना ठार करत आहेत. दुसरीकडे एनआयएचे पथक दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळत आहे. गुप्तचर विभागाकडून त्यांना माहिती दिली जात आहे. या माहितीवरून दहशतवाद्यांच्या भूमिगत साथीदारांवर आणि अड्ड्यांवर छापे टाकण्यात येत आहेत.


दरम्यान, काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर दहशतवाद्यांचे हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर यंत्रणांची मॅरेथॉन बैठक बोलावली असून या बैठकीला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित आहेत. दुपारी २ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंतपर्यंत म्हणजे सलग आठ तासांहून अधिक काळ ते स्वतंत्र बैठका होत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या वार्षिक सभेला ते आधी संबोधित करतील.


या बैठकीत देशाच्या विविध राज्यांचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांच्यासह गुप्तचर विभागाचे प्रमुखही उपस्थित आहेत. निमलष्करी दलाचे प्रमुखही यात सहभागी आहेत. यावेळी परिषदेची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. कारण जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रणनीती बदलत सामान्य नागरिकांची आणि स्थलांतरितांच्या हत्या सुरू केल्या आहेत. दहशतवाद्यांनी तिथे १३ दिवसांत ११ नागरिकांची हत्या केली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये होत असलेल्या या हत्यांसह चीन आणि बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवरही चर्चा होणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची