नेरुळ-उरण रेल्वे मार्गिका पुढील वर्षी सप्टेंबरपासून सुरू

घनःश्याम कडू


उरण : मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण ही उपनगरीय चौथी संपूर्ण मार्गिका सप्टेंबर २०२२ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. यातील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील कामाला गती दिली जात असून ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


नेरुळ-बेलापूर-खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. यातील नेरुळ ते बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांच्या सेवेत आला आहे; परंतु, भूसंपादनासह अनेक अडथळ्यांमुळे नेरुळ ते उरण संपूर्ण प्रकल्प रखडला. यातील पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाला. तथापि, खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी प्रकल्पासाठीचा एकूण ५०० कोटींचा खर्च सुमारे १७०० कोटींपर्यंत पोहोचला.


खारकोपरपुढील उरणपर्यंतच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादनाची समस्या कायम होती. यात सिडकोकडून तीन किलोमीटरची जागा रेल्वेला मिळणे बाकी होती. त्याचे भूसंपादन पार पडले आणि ती जागा रेल्वेला मिळाली. त्यामुळे मोठा अडसर दूर झाला असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण मार्गिकाही पूर्ण करून सप्टेंबर २०२२ पासून नेरुळ ते उरण संपूर्ण उपनगरीय मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती देण्यात आली.


एकूण २७ किमी लांबीच्या मार्गातील १४.६० किमीचे काम शिल्लक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेत खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वे स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. मध्य रेल्वेने लॉकडाऊनमध्ये हा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला असून प्रकल्प पूर्ण झाल्यास नेरुळ व उरणवासीयांबरोबरच अन्य प्रवाशांनाही त्याचा बराच फायदा होईल. यामुळे जेएनपीटी आणि येत्या काळात तयार होणारे नवी मुंबई विमानतळही जोडले जाईल.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य