दिवाळीपासून राणीबाग पर्यटकांसाठी खुली

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीपासून मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता उद्यान म्हणजे राणीबागे खुले होत आहे. यामुळे बच्चे कंपनीसाठी ही दिवाळी खास असणार आहे. मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून राणीबागमध्ये फिरावे लागणार आहे. तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे राणीबाग प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.


फेब्रुवारी महिन्यात राणी बाग सुरू करण्यात आली. मात्र लोकांची गर्दी पाहता तसेच पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर ५ एप्रिलपासून उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने राणीबाग नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.


राणीबाग सुरू करण्याचा निर्णय घेत प्रशासनाकडून कोरोना खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत आराखडाही तयार करण्यात आला आहे. यात मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना लसीची अट घालण्यात आलेली नसली तरी गर्दी वाढल्यास गेट बंद करण्यात येईल, गर्दीवर नियंत्रण आणि पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी ४० सुरक्षा रक्षकांची टीम तैनात केली जाईल. जागोजागी सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. प्राण्यांचे निवासस्थान ग्लासने बंदिस्त असल्याने निकट संपर्क टळणार असून मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दोन डोस घेतलेले असल्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७