प्रहार    

डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरवस्था

  161

डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरवस्था

डहाणू (वार्ताहर) : डहाणू-नाशिक राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडत असून याकडे बांधकाम प्रशासन डोळेझाक करत आहे. यावर्षी तर खूप मोठा पाऊस पडल्याने खड्ड्यांची संख्याही वाढली असून या राज्यमार्गावर वाहतूकही वाढली आहे. परिणामी, या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.


डहाणू, नाशिक, मुंबई, ठाणे, गुजरातकडे मोठी वाहन वाहतूक होत असते. डहाणू येथे असणारे अदानी कंपनी, आशागड येथील युनिव्हर्सल कॅप्सूल कंपनी, डहाणू, वाणगाव येथील भाजी, चिकू, मासे यांचे मोठी बाजारपेठ असल्याने वाहतुकीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्याचप्रमाणे वाढवण येथे नवीन बंदर निर्माण प्रकल्प सुरू असून त्याच्या कामानिमित्त अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच, नवीन रेल्वे रुळांची अनेक कामे सुरू असल्याने अवजड वाहनेही ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत डहाणू बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा रस्त्याची डागडुजी होत नाही. मागे दोन चार वेळा तात्पुरता खड्डे बुजवण्यात आले होते, पण पडलेल्या मोठ्या पावसाने पुन्हा पूर्ववत खड्डे निर्माण झाले आहेत.


गंजाड, रानशेत, वधना, चारोटी, कासा या भागात खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे, कासा गायकवाड पाडा, नर्सरी, ठाणा बँक, बाजारपेठ येथील पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी साचून राहत असल्याने रस्ता नादुरुस्त होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाणारे गटार दोन्ही बाजूंना व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावर साठून रस्ता खड्डेमय होत आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.



मोठा अपघात होण्याची वाट बघताय का?


पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त झाली असून अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. यावर्षीचे गणपती, नवरात्र हे दोन्ही सण या खड्ड्यांची दुरुस्ती झाल्याने नागरिकांना खूप त्रास करत हा प्रवास करावा लागला. बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. बांधकाम विभाग अजून मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का, असा उद्विग्न प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

Comments
Add Comment

चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे

मुंबई महापालिकेच्या आता ‘संपर्क स्मार्ट शाळा’

१८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार लाभ मुंबई : महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने

मुसळधार पावसामुळे सातही तलावांच्या पाणीपातळीत वाढ

जलाशयातील पाणीसाठा पोहोचला ८९ टक्क्यांवर मुंबई : मुंबईतील पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची

शिवाजी पार्क मैदानातील कचरा पेट्या गायब

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजीपार्क

'अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राच्या कागद वापरु नका '

अन्न व औषध प्रशासनाची सूचना मुंबई : अन्नपदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि