डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरवस्था

डहाणू (वार्ताहर) : डहाणू-नाशिक राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडत असून याकडे बांधकाम प्रशासन डोळेझाक करत आहे. यावर्षी तर खूप मोठा पाऊस पडल्याने खड्ड्यांची संख्याही वाढली असून या राज्यमार्गावर वाहतूकही वाढली आहे. परिणामी, या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.


डहाणू, नाशिक, मुंबई, ठाणे, गुजरातकडे मोठी वाहन वाहतूक होत असते. डहाणू येथे असणारे अदानी कंपनी, आशागड येथील युनिव्हर्सल कॅप्सूल कंपनी, डहाणू, वाणगाव येथील भाजी, चिकू, मासे यांचे मोठी बाजारपेठ असल्याने वाहतुकीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्याचप्रमाणे वाढवण येथे नवीन बंदर निर्माण प्रकल्प सुरू असून त्याच्या कामानिमित्त अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच, नवीन रेल्वे रुळांची अनेक कामे सुरू असल्याने अवजड वाहनेही ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत डहाणू बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा रस्त्याची डागडुजी होत नाही. मागे दोन चार वेळा तात्पुरता खड्डे बुजवण्यात आले होते, पण पडलेल्या मोठ्या पावसाने पुन्हा पूर्ववत खड्डे निर्माण झाले आहेत.


गंजाड, रानशेत, वधना, चारोटी, कासा या भागात खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे, कासा गायकवाड पाडा, नर्सरी, ठाणा बँक, बाजारपेठ येथील पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी साचून राहत असल्याने रस्ता नादुरुस्त होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाणारे गटार दोन्ही बाजूंना व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावर साठून रस्ता खड्डेमय होत आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.



मोठा अपघात होण्याची वाट बघताय का?


पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त झाली असून अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. यावर्षीचे गणपती, नवरात्र हे दोन्ही सण या खड्ड्यांची दुरुस्ती झाल्याने नागरिकांना खूप त्रास करत हा प्रवास करावा लागला. बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. बांधकाम विभाग अजून मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का, असा उद्विग्न प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल