दिवाळीपर्यंत कांदा महागण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाचा कांदा पिकांना जोरदार फटका बसला आहे. या पावसाने नवीन कांदा पिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत असून दिवाळीपर्यंत कांदा आणखी कडाडण्याची शक्यता आहे.


आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीच्या पावसाने कहर केला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कांद्याला जास्त मागणी आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होईल. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील.


महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत येथील शेतकरी कांद्याचा पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो मिळत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १०० ते १३० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. येथे ३० ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या किरकोळ बाजारात हा कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकला जात आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.



Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला नवा पर्याय

 नेरळ-शिरूर कॉरिडॉरला मंजुरी; १३३ किलोमीटर चौपदरी महामार्ग खासगी भागीदारीतून साकारणार मुंबई : मुंबई-पुणे

Govandi Crime : गोवंडीत ६ वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार; 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील गोवंडी (Mumbai Govandi Area) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका

DC VS KKR : सलग चौथ्या विजयसाठी केकेआर सज्ज, दिल्लीसाठी करो या मरो चा सामना...

अरुण जेटली स्टेडियवर दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५१ वा सामना दिल्ली विरुद्ध केकेआर

PCOD Clinic : राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांत आता 'पीसीओडी क्लिनिक'

दर १५ दिवसांनी तज्ज्ञ डॉक्टर भेट देणार; आरोग्यसेवा, सल्लाही विनामुल्य मुंबई : राज्यातील महिला आणि युवतींमध्ये

BMC News : महापालिकेत ठरावाच्या सूचना बाद होण्याची हॅट्रीक

सलग तिसऱ्या महिन्यात ठरावाच्या सूचना सभागृहात झाल्या रद्द मुंबई (सचिन धानजी) तब्बल पावणे चार वर्षांनंतर

Medical Store Close At 20 May : महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद; कारण वाचा...

येत्या २० मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या आणि रुग्णांच्या चिंतेत भर टाकणारी एक मोठी घडामोड समोर