दुसरी लाट ओसरत असल्याने परप्रांतीय परतले

मुंबई : देशात करोना संसर्ग वाढू लागल्याने मुंबईसारख्या शहरातून गावाकडे परतलेले परप्रांतीय मजूर पुन्हा शहराची वाट धरत आहेत. दुसरी लाट आता ओसरत असून सणासुदीच्या निमित्ताने कामेही वाढली आहेत. त्यामुळे कुर्ला, खैरानी, धारावी, मालवणी, अंबूजवाडी या परिसरामध्ये पुन्हा कामगारांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईत परत आलेल्या या कामगारांची वैद्यकीय चाचणी तसेच लसीकरण पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतर कामाला रुजू करून घेत असल्याचा अनुभव या कामगारांनी सांगितला आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक पातळ्यांवर या कामगारांना संघर्ष करावा लागला होता.


मुंबईत ते ज्या ठिकाणी काम करत होते, तिथे निर्बंध कमी झाल्यामुळे पुन्हा रोजगाराच्या शोधात आले आहेत, असे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी काम करणाऱ्या बिलाव खान यांनी सांगितले. बिलाव यांनी लॉकडाउनच्या काळातील असंघटित कामगारांच्या मोबदल्याच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले. 'अनेकांना केलेल्या कामाचे पैसे पूर्ण मिळाले नाहीत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर असंख्य तक्रारी आल्या होत्या. मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत काही लाख रुपयांची भरपाई या कामगारांना करून देऊ शकलो,' असे त्यांनी सांगितले.


मुंबई व्यतिरिक्त अन्य ठिकाणी रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न विचारला असता जमुना दास यांनी तामिळनाडू, मध्य प्रदेश येथे काम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे मिळणारा रोजगार हा मुंबईइतका नसल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. दिवाळीच्या काळामध्ये रंगकाम, घराची दुरुस्ती, फर्निचर व्यवसायामध्ये कारागीरांची गरज भासते. त्यात मोबदला चांगला मिळतो, असेही त्यांनी सांगितले. धारावीमध्ये विविध प्रकारचे लघुउद्योग सुरू आहेत. या उद्योगाचे चक्र करोना संसर्गाच्या काळामध्ये विस्कटले होते. धारावीतील संसर्ग आता दादर, माहिमच्या तुलनेत चांगल्या प्रकारे नियंत्रणात असल्यामुळे येथेही कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.


Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.