वाकण-पाली-खोपोली महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

गौसखान पठाण


सुधागड-पाली : वाकड-पाली-खोपोली राज्य महामार्ग क्रमांक ५४८ (अ) च्या रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. सद्य स्थितीत या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळा आला की मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल व राडारोडा जमा होतो. नंतर ऊन पडले की धुरळा उडतो, अशी दुहेरी समस्या येथे सतावत आहे. प्रवासादरम्यान मान, मणका, कमरेची हाडे सर्वकाही खिळखिळे होतात. तर वाहनेही बिघडून वाहनधारकांना न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. पाली ते रासळ हा तीन किमीचा मार्गाची सध्या खूप दुरवस्था झाली आहे.


मार्गावरील मोठ्या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होण्याचा धोका आहे. या राज्य मार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊन पासून हे काम संथ गतीने सुरू आहे. अपूर्ण व अर्धवट असलेले काम, काही ठिकाणी खराब झालेला मार्ग यामुळे प्रवासी, वाहन चालक, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे. जवळपास १९८ कोटी रु. खर्च करून राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होत आहे. या राज्य मार्गाचे काम पूर्वी मोनिका कन्ट्रक्शनकडे होते. मात्र त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने एमएसआरडीसीने बीसीसी कन्ट्रक्शनकडे दिले होते.


तरीही सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम यामुळे हे काम वरह इन्फ्रा लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र अजूनही कामाला पाहिजे तेवढा वेग आलेला नाही. वाकण-पाली-खोपोली महामार्गाचे आजही संथ गतीने काम सुरू आहे वाहनचालक, प्रवासी यांची आजही प्रवासादरम्यान प्रचंड गैरसोय होत असून एमएसआरडीसी यांच्या कारभाराबाबत नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


वाकण-पाली-खोपोली महामार्गाच्या संथ व अर्धवट कामामुळे तसेच योग्य नियोजनाचा अभाव यामुळे या मार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक होत आहे. लवकरात लवकर हा मार्ग सुस्थितीत करावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष एमएसआरडीसीच्या विरोधात जन आंदोलन उभे करेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे , रायगड जिल्हा सरचिटणीस,ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार