नवी मुंबईतील विविध भुयारी मार्ग खडतर!



नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील भूमिगत भुयारी मार्गांची अवस्था खडतर असून, नेरूळ येथील एलपी या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत भुयारी मार्गाचे पाणी साचून डबके झाले आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे.


महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांनी रेल्वेस्थानक परिसर व महामार्गाखाली भूमिगत रस्त्यांची निर्मिती केली. पण, या भूमिगत पुलांची पावसाळ्यात वाताहत होत असल्याने वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांना याचा फार मोठा त्रास होत आहे.


नवी मुंबई परिसरातील रस्ते, महामार्ग व रेल्वे स्थानकाच्या शेजारून दळणवळणासाठी मनपा, सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए विभागाने भूमिगत भुयारी रस्ते तयार केले; परंतु पावसाळा सुरू झाला की, निचरा होत असलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे. तसेच पादचाऱ्यांनासुद्धा येथून चालताना कमालीचा त्रास होत आहे.


रबाळे, ऐरोली, कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या भूमिगत भुयारी मार्गात याचा अनुभव नियमित नागरिक घेत आहेत. तर ठाणे, बेलापूर महामार्गावर महापे उड्डाणपुलाशेजारी एमएमआरडीएने बांधलेल्या भुयारी मार्गाची अवस्था देखील अशीच आहे. येथेही पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह चांगलाच होत असतो. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.


भुयारांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठल्याने मच्छरांच्या पैदाशीला आमंत्रण मिळत आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. भुयारी मार्गात पाणी असल्याने साहजिकच नागरिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे आपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.


मनपाचे दुर्लक्ष....


नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून मनपाकडून संबंधित विभागाला कळवून कार्यवाही करण्यास भाग पडण्याची गरज आहे.


नेरूळ येथील भुयारी मार्गात पाणी साठले आहे. मच्छरांची पैदास होऊ नये, म्हणून फवारणी करत असतो. तसेच तिथे अस्वच्छता होणार नाही. याची काळजी घेत असतो. भुयारी मार्गाविषयी पुढील निर्णय घेण्यासाठी सा. बा. विभागाला कळविले जाईल. - राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी, नेरूळ


 

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय