नवी मुंबईतील विविध भुयारी मार्ग खडतर!



नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील भूमिगत भुयारी मार्गांची अवस्था खडतर असून, नेरूळ येथील एलपी या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत भुयारी मार्गाचे पाणी साचून डबके झाले आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे.


महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांनी रेल्वेस्थानक परिसर व महामार्गाखाली भूमिगत रस्त्यांची निर्मिती केली. पण, या भूमिगत पुलांची पावसाळ्यात वाताहत होत असल्याने वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांना याचा फार मोठा त्रास होत आहे.


नवी मुंबई परिसरातील रस्ते, महामार्ग व रेल्वे स्थानकाच्या शेजारून दळणवळणासाठी मनपा, सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए विभागाने भूमिगत भुयारी रस्ते तयार केले; परंतु पावसाळा सुरू झाला की, निचरा होत असलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे. तसेच पादचाऱ्यांनासुद्धा येथून चालताना कमालीचा त्रास होत आहे.


रबाळे, ऐरोली, कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या भूमिगत भुयारी मार्गात याचा अनुभव नियमित नागरिक घेत आहेत. तर ठाणे, बेलापूर महामार्गावर महापे उड्डाणपुलाशेजारी एमएमआरडीएने बांधलेल्या भुयारी मार्गाची अवस्था देखील अशीच आहे. येथेही पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह चांगलाच होत असतो. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.


भुयारांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठल्याने मच्छरांच्या पैदाशीला आमंत्रण मिळत आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. भुयारी मार्गात पाणी असल्याने साहजिकच नागरिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे आपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.


मनपाचे दुर्लक्ष....


नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून मनपाकडून संबंधित विभागाला कळवून कार्यवाही करण्यास भाग पडण्याची गरज आहे.


नेरूळ येथील भुयारी मार्गात पाणी साठले आहे. मच्छरांची पैदास होऊ नये, म्हणून फवारणी करत असतो. तसेच तिथे अस्वच्छता होणार नाही. याची काळजी घेत असतो. भुयारी मार्गाविषयी पुढील निर्णय घेण्यासाठी सा. बा. विभागाला कळविले जाईल. - राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी, नेरूळ


 

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते