नवी मुंबईतील विविध भुयारी मार्ग खडतर!



नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील भूमिगत भुयारी मार्गांची अवस्था खडतर असून, नेरूळ येथील एलपी या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत भुयारी मार्गाचे पाणी साचून डबके झाले आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे.


महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांनी रेल्वेस्थानक परिसर व महामार्गाखाली भूमिगत रस्त्यांची निर्मिती केली. पण, या भूमिगत पुलांची पावसाळ्यात वाताहत होत असल्याने वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांना याचा फार मोठा त्रास होत आहे.


नवी मुंबई परिसरातील रस्ते, महामार्ग व रेल्वे स्थानकाच्या शेजारून दळणवळणासाठी मनपा, सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए विभागाने भूमिगत भुयारी रस्ते तयार केले; परंतु पावसाळा सुरू झाला की, निचरा होत असलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे. तसेच पादचाऱ्यांनासुद्धा येथून चालताना कमालीचा त्रास होत आहे.


रबाळे, ऐरोली, कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या भूमिगत भुयारी मार्गात याचा अनुभव नियमित नागरिक घेत आहेत. तर ठाणे, बेलापूर महामार्गावर महापे उड्डाणपुलाशेजारी एमएमआरडीएने बांधलेल्या भुयारी मार्गाची अवस्था देखील अशीच आहे. येथेही पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह चांगलाच होत असतो. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.


भुयारांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठल्याने मच्छरांच्या पैदाशीला आमंत्रण मिळत आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. भुयारी मार्गात पाणी असल्याने साहजिकच नागरिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे आपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.


मनपाचे दुर्लक्ष....


नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून मनपाकडून संबंधित विभागाला कळवून कार्यवाही करण्यास भाग पडण्याची गरज आहे.


नेरूळ येथील भुयारी मार्गात पाणी साठले आहे. मच्छरांची पैदास होऊ नये, म्हणून फवारणी करत असतो. तसेच तिथे अस्वच्छता होणार नाही. याची काळजी घेत असतो. भुयारी मार्गाविषयी पुढील निर्णय घेण्यासाठी सा. बा. विभागाला कळविले जाईल. - राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी, नेरूळ


 

Comments
Add Comment

Goregoan Traffic : वाहतूक कोंडीत अडकून रुग्णाने रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का?

गोरेगावमधील भाजपाच्या माजी नगरसेविकेचा प्रशासनाला संतप्त सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव पूर्व येथील आरे

राज्यात २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झाले मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (२ डिसेंबर) मतदान पार पडले. राज्यातील नगरपरिषदा व

Jay Pawar Rutuja Patil wedding : खास 'वऱ्हाड' बहरीनला! जय पवार-ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण; विदेशात रंगणार शाही सोहळा

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून