गोव्यातील शिवसेना उपाध्यक्षाने दस-यालाच ठोकला राजीनामा

पणजी : इकडे शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करत असताना तिकडे गोव्यात मात्र सेनेला मोठा धक्का बसला. ऐन दसऱ्याच्या दिवशीच गोव्यातील शिवसेनेच्या उपाध्यक्षा आणि पक्ष प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेसाठी गोव्याच्या राजकारणात हा मोठा धक्का मानला जात आहे. फक्त राजीनामा देऊन स्वस्थ न बसता राखी नाईक यांनी शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.


राखी नाईक म्हणाल्या की, गोव्याच्या प्रश्नात शिवसेनेच्या नेत्यांना रसच नाही. गोव्यातील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना तळमळ दाखवेल, अशी अपेक्षा असल्यामुळेच आपण पक्षात प्रवेश केला होता. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी दिसली नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.


गोव्यात पक्षाची वाढ व्हायची असेल, तर गोवेकरांच्या स्थानिक प्रश्नांमध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेना नेते नुसते गोव्यात पर्यटनासाठी येतात. खातात, पितात आणि निघून जातात. मात्र प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नावर काहीच हालचाल होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोव्यातील जनतेप्रति आपली जबाबदारी असून पक्षापेक्षा जनता अधिक महत्त्वाची असल्याचे नाईक म्हणाल्या.


कुठल्या पक्षात प्रवेश घेण्याबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक असा कुठलाही विचार सध्या नसून जनतेची कामं करण्यावर आपला भर असेल्याचेही त्या म्हणाल्या.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च