मातीवस्तू निर्मिती व्यवसायाला संजीवनी मिळण्याची आशा?

वाडा (वार्ताहर) : पूर्वीच्या काळात घरोघरी मातीच्या चुली वापरल्या जात. आधुनिक काळात घरोघरी गॅस शेगड्यांचा वापर सुरू झाल्याने मातींच्या चुलींची मागणी कमी झाली व त्यामुळे मातीच्या वस्तू बनवणाऱ्या या व्यवसायाला घराघर लागली. परंतु, आधुनिक काळातही लोकांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळू लागल्याने याच वस्तूंकडे लोक आकर्षित होताना दिसत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला पुन्हा संजीवनी मिळेल अशी आशा उत्पादकांना वाटत आहे.


शेकडो वर्षांपासून मातीचे माठ, चुली, चुलुंबे, पणत्या, सुगडे, लग्नविधीसाठीचे न्हाणे, बांडी, मडके इत्यादी वस्तू मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होता. परंतु, आधुनिक काळात या वस्तू हद्दपार होताना दिसत होत्या. मात्र, आधुनिकतेबरोबर लोखंडी, प्लास्टिक इत्यादींपासून बनवलेल्या वस्तूंमुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याचे दिसू लागताच पुन्हा मातीच्याच वस्तूंकडे माणसाचा कल वाढू लागल्याचे मातीवस्तू निर्मिती व्यवसायिकांचे म्हणणे आहे.


मातीच्या वस्तूचे महत्त्व नागरिकांना पटत चालल्याने तसेच चुलीवरच्या जेवणाची लज्जतही लोकांना भुरळ घालत असल्याने आज चुलींनाही मागणी वाढत आहे. कुणबी तसेच आगरी समाजात लग्नसमारंभातही चुलीची आवश्यकता भासत असते. आज मातीच्या चुली २५० ते ३०० रुपये तर चुलुंबा १०० ते १५० रुपये या दराने विक्री होत असते.


वडिलोपार्जित या व्यवसायावरच आमच्या कुटुंबीयांचा उदर्निवाह होत असून हा व्यवसाय काही काळ लोप पावत चालला होता. मात्र, आता पुन्हा या व्यवसायाला संजीवनी मिळेल अशी आशा आहे. - वर्षा चिरनेरकर, माती वस्तू व्यवसायिक, कुंभार आळी, वाडा


Comments
Add Comment

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि