मातीवस्तू निर्मिती व्यवसायाला संजीवनी मिळण्याची आशा?

वाडा (वार्ताहर) : पूर्वीच्या काळात घरोघरी मातीच्या चुली वापरल्या जात. आधुनिक काळात घरोघरी गॅस शेगड्यांचा वापर सुरू झाल्याने मातींच्या चुलींची मागणी कमी झाली व त्यामुळे मातीच्या वस्तू बनवणाऱ्या या व्यवसायाला घराघर लागली. परंतु, आधुनिक काळातही लोकांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळू लागल्याने याच वस्तूंकडे लोक आकर्षित होताना दिसत आहेत. त्यामुळे या व्यवसायाला पुन्हा संजीवनी मिळेल अशी आशा उत्पादकांना वाटत आहे.


शेकडो वर्षांपासून मातीचे माठ, चुली, चुलुंबे, पणत्या, सुगडे, लग्नविधीसाठीचे न्हाणे, बांडी, मडके इत्यादी वस्तू मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होता. परंतु, आधुनिक काळात या वस्तू हद्दपार होताना दिसत होत्या. मात्र, आधुनिकतेबरोबर लोखंडी, प्लास्टिक इत्यादींपासून बनवलेल्या वस्तूंमुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याचे दिसू लागताच पुन्हा मातीच्याच वस्तूंकडे माणसाचा कल वाढू लागल्याचे मातीवस्तू निर्मिती व्यवसायिकांचे म्हणणे आहे.


मातीच्या वस्तूचे महत्त्व नागरिकांना पटत चालल्याने तसेच चुलीवरच्या जेवणाची लज्जतही लोकांना भुरळ घालत असल्याने आज चुलींनाही मागणी वाढत आहे. कुणबी तसेच आगरी समाजात लग्नसमारंभातही चुलीची आवश्यकता भासत असते. आज मातीच्या चुली २५० ते ३०० रुपये तर चुलुंबा १०० ते १५० रुपये या दराने विक्री होत असते.


वडिलोपार्जित या व्यवसायावरच आमच्या कुटुंबीयांचा उदर्निवाह होत असून हा व्यवसाय काही काळ लोप पावत चालला होता. मात्र, आता पुन्हा या व्यवसायाला संजीवनी मिळेल अशी आशा आहे. - वर्षा चिरनेरकर, माती वस्तू व्यवसायिक, कुंभार आळी, वाडा


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत