कोविड केंद्रे डिसेंबरपर्यंत राहणार खुली

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना काळात मुंबई महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरू केली होती. ही कोविड केंद्र डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट थोपवण्यासाठी पालिकेने मुंबईत जम्बो कोविड केंद्र उभारली होती. ही कोविड केंद्र कोरोना रुग्णांच्या सेवेत तत्पर होती, मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, यामुळे गोरेगाव, वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणी अनेक खाटा रिक्त आहेत, तर मालाड, सोमय्या मैदान, कंजूरमार्ग येथे पालिका नव्याने कोविड केंद्र सुरू करत असून हे कोविड केंद्र पालिका काही खासगी रुग्णालयांना चालवण्यासाठी देणार आहे. मात्र इतर केंद्रप्रमाणे न चालवता पालिका खासगी रुग्णालयांना का देते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.


मागच्या आठवड्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढताना दिसला. तथापि, सध्या कोरोना रुग्णसंख्या फारच कमी आहे महापालिकेने तिसरी लाट येण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असले तरी खबरदारी म्हणून डिसेंबरपर्यंत ही कोविड केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती

मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा