बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच

घन:श्याम कडू


उरण : नवी मुबंई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घालण्याचे आदेश नवी मुबंई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी दिले असतानाही या आदेशाला केराची टोपली दाखवून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे आज घडलेल्या अपघातावरून उघड होत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पहाणी करूनही उरण-पनवेल परिसरातील वाहतूककोंडी कमी होताना दिसत नाही.



उरणला अनधिकृत कंटेनर यार्डचा विळखा


आज गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरील वैश्वी गावाजवळ भरधाव ट्रेलरने इको गाडीला धडक दिली. सुदैवाने या गाडीतील ८ जण जखमी होऊन त्यांचा जीव वाचला आहे. यावरून उरणमधील अपघाताची मालिका सुरूच असल्याचे उघड होते. उरण परिसरात होणारी वाहतूककोंडी व अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून यावर उपाययोजना केली होती. तसेच, नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी आदेश काढून अवजड वाहनांस सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घातली होती. या आदेशाला केराची टोपली दाखवत अवजड वाहतूक खुलेआम सुरू आहे. मात्र, आज वैश्वी गावाजवळ झालेल्या अपघातामुळे अवजड वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले आहे.


उरण परिसरात अनेक कंटेनर यार्ड उभे राहिले आहेत. त्यामधील अनेक कंटेनर यार्ड अनधिकृत आहेत. त्यांच्या सेवेसाठी शासकीय प्रशासन यंत्रणा राबत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे. सदर कंटेनर यार्डमधील वाहनांना ये-जा करण्यासाठी बेकायदेशीर रस्त्यावर वाट करून देणे व भर रस्त्यावर ट्रेलर उभे करणे यामुळेच वाहतूककोंडी व वारंवार अपघात घडत आहेत. अपघातामध्ये अनेक तरुणांचा जीव गेला आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारीवर्गाकडून ठोस कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे.



...अन्यथा असेच अपघात होत राहणार


अपघाताची मालिका रोखण्यासाठी अवजड वाहतुकीस बंदी असलेल्या आदेशाचे पालन करणे व परिसरातील अनधिकृत कंटेनर यार्ड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा उरणकरांना अशा घडणाऱ्या अपघातांचा सामना करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य