तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात : उद्धव ठाकरे


दसरा मेळाव्यात तेच मुद्दे, तेच विषय




मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर कदाचित आज ना उद्या तुम्ही देखील पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात. पण तुमच्या नशीबात नव्हते. म्हणून तुम्ही वचन मोडले. मी हे पद स्वीकारले, एका जबाबदारीने स्वीकारले, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वतःच्या अंगात हिंमत असेल तर समोरुन लढा द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्दाचे लक्षण नाही, असे ते म्हणाले.


भाषणातील ठळक मुद्दे -


- सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसे करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरू झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा.


- माझे भाषण कधी थांबते आणि कधी एकदा चिरकतो, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणे, चिरकणे यातूनच त्यांना रोजगार मिळतो.


- भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत.
महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला, असा गळा भाजपाचे लोक काढतात. आहेत. मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का?


- महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून होणारी ढवळाढवळ खपवू दिली जाणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र होऊन लढा उभारला पाहिजे. जसे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींने दाखवून दिले, तसे तुम्ही दाखवले पाहिजे.


- महिलांवरी अत्याचार हे देशभर वाढत आहेत. विधानसभेचे अधिवेशन कशाला. आपण मोदीजींना सांगा आणि संसदेचे अधिवेशन आठवडाभर घ्या.

Comments
Add Comment

Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या; म्हणाल्या, न घाबरता 'ती' भूमिका...महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वरून वाद पेटला!

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश

विस्तारित मेट्रो लाईन ५- ठाणे,भिवंडी,उल्हासनगरमधील कनेक्टिविटी अधिक सक्षम, ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला मोठी गती

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात मुंबई : मुंबईकरांचा

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि.

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू