स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थ नाराज

सुधागड-पाली (वार्ताहर): सुधागड तालुक्यातील व-हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील दांडकातकरवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने अदीवासी बांधवांना अंत्यविधीसाठी वणवण करावी लागत होती. याबाबत वारंवार वर्तमानपत्रांमध्ये आवाज उठवल्यानंतर हा विषय निकाली निघाला खरा. व-हाड-जांभुळपाडा ग्रामपंचायतीने २ लाख २२ हजार रुपये खर्च करून दांडअदीवासीवाडीला स्मशानभूमी बांधण्यात आली. एवढे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याकरिता मार्ग नसल्यामुळे ग्रामस्थांना नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमित अंत्यविधी न करता आजही दगडी रचून अंत्यविधी केली जात आहे.


आधी लढा दिला तो स्मशानभूमीसाठी आता लढा आहे स्मशानभुमी कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दांडआदिवासी वाडीतील ग्रामस्थांच्या समस्यांचा तोडगा निघणार निघणार तरी कधी ? असा संतप्त सवाल दांड वाडीतील आदिवासी ग्रामस्थ विचारत आहे.


आज पर्यंत आमच्या वाडीला स्मशान भूमी मिळावी याकरिता अनेक वेळा निवेदनदेऊन संघर्ष करावे लागले आहे. आज नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता नाही.जो पर्यंत आम्हाला स्मशानभूमी कडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही नव्याने बांधण्यात आलेला स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करणार नाही. - शंकर पवार, ग्रामस्थ दांडआदिवासीवाडी

Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले