शाळा सुरू झाल्या तरी अध्ययनाच्या लिंक मोबाईलवरच!

  105

नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शहरी भागातील काही शाळांना काही वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळेची घंटा अकरा दिवसांपूर्वी वाजली, तरीही ऑनलाइन अभ्यासाच्या लिंक मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलवरच येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.


शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन शिकवणीचा प्रश्न दूर होईल, अशी समजूत पालक वर्गाची होती; परंतु ऑनलाइन शिकवणी बंद केली असली तरी शिक्षक वर्ग विविध अध्ययनाच्या लिंक मोबाईलवर पाठवून विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास भाग पाडत आहेत. यामुळे नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्ग चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईलचा वापर केल्याने आरोग्यावरही परिणाम होत आहे.


मोबाईल, संगणक व लॅपटॉपच्या सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या नेत्ररोगाचे परिणाम समोर आले आहेतच. तसेच हेडफोनच्या वापरामुळे कानांचे आजारही समोर आले होते. तसेच मुलांना स्थूलपणाच्या समस्येनेही घेरले होते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालकांना मोबाईल खरेदीसाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागला होता. या सर्व समस्या सर्वश्रुत असताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


नवी मुंबई मनपा क्षेत्रातील शाळा जर विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास प्रवृत्त करत असतील, तर असे करू नये. सर्व शाळांना सूचना दिल्या जातील. - जयदीप पवार,उपायुक्त, शिक्षण, मनपा

Comments
Add Comment

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही

मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्यांचे खोल समुद्रात होणार विसर्जन

पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर मंडळांना मिळणार दिलासा मुंबई : ‘पीओपी’वरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक