शाळा सुरू झाल्या तरी अध्ययनाच्या लिंक मोबाईलवरच!

नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शहरी भागातील काही शाळांना काही वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळेची घंटा अकरा दिवसांपूर्वी वाजली, तरीही ऑनलाइन अभ्यासाच्या लिंक मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलवरच येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.


शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन शिकवणीचा प्रश्न दूर होईल, अशी समजूत पालक वर्गाची होती; परंतु ऑनलाइन शिकवणी बंद केली असली तरी शिक्षक वर्ग विविध अध्ययनाच्या लिंक मोबाईलवर पाठवून विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास भाग पाडत आहेत. यामुळे नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्ग चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईलचा वापर केल्याने आरोग्यावरही परिणाम होत आहे.


मोबाईल, संगणक व लॅपटॉपच्या सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या नेत्ररोगाचे परिणाम समोर आले आहेतच. तसेच हेडफोनच्या वापरामुळे कानांचे आजारही समोर आले होते. तसेच मुलांना स्थूलपणाच्या समस्येनेही घेरले होते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालकांना मोबाईल खरेदीसाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागला होता. या सर्व समस्या सर्वश्रुत असताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


नवी मुंबई मनपा क्षेत्रातील शाळा जर विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास प्रवृत्त करत असतील, तर असे करू नये. सर्व शाळांना सूचना दिल्या जातील. - जयदीप पवार,उपायुक्त, शिक्षण, मनपा

Comments
Add Comment

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि