शाळा सुरू झाल्या तरी अध्ययनाच्या लिंक मोबाईलवरच!

नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शहरी भागातील काही शाळांना काही वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळेची घंटा अकरा दिवसांपूर्वी वाजली, तरीही ऑनलाइन अभ्यासाच्या लिंक मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलवरच येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.


शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन शिकवणीचा प्रश्न दूर होईल, अशी समजूत पालक वर्गाची होती; परंतु ऑनलाइन शिकवणी बंद केली असली तरी शिक्षक वर्ग विविध अध्ययनाच्या लिंक मोबाईलवर पाठवून विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास भाग पाडत आहेत. यामुळे नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्ग चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईलचा वापर केल्याने आरोग्यावरही परिणाम होत आहे.


मोबाईल, संगणक व लॅपटॉपच्या सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या नेत्ररोगाचे परिणाम समोर आले आहेतच. तसेच हेडफोनच्या वापरामुळे कानांचे आजारही समोर आले होते. तसेच मुलांना स्थूलपणाच्या समस्येनेही घेरले होते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालकांना मोबाईल खरेदीसाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागला होता. या सर्व समस्या सर्वश्रुत असताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


नवी मुंबई मनपा क्षेत्रातील शाळा जर विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास प्रवृत्त करत असतील, तर असे करू नये. सर्व शाळांना सूचना दिल्या जातील. - जयदीप पवार,उपायुक्त, शिक्षण, मनपा

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२