शिवसेना भवनासमोर मनसेची पोस्टरबाजी

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र निर्माण सेना या दोघांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यातूनच मनसेने आता पोस्टरबाजी सुरू केली आहे. मनसेकडून दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर ‘गर्व से कहो, हम हिंदू हैं’ असे लिहिले आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटोही छापण्यात आला आहे.


सेनाभवनासमोर हे पोस्टर लावून हिंदुत्वाचा नारा बुलंद करतानाच शिवसेनेने हिंदूत्वापासून फारकत घेतली आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न मनसेने या पोस्टरद्वारे केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी मनसेने असे पोस्टर्स लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.


शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करण्यात येत आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी घरोबा केल्यानंतर या टीकेची धार अधिकच तीव्र झाली. शिवसेनेच्या या भूमिकेवरून नाराज असलेल्या शिवसैनिकांना आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत.


हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्वाचे विचार हे मनसेप्रमुख राज ठाकरे पुढे घेऊन जाऊ शकतात आणि ज्या लोकांमध्ये धमक आहे, तेच लोक म्हणू शकतात ‘गर्व से कहो हम हिंदू है’. दसऱ्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी हा बॅनर लावला आहे आणि फक्त दादरमध्येच नाही तर प्रभादेवी, वरळी या ठिकाणीदेखील लावले आहेत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक